राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थात विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर करताना पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दरामुळे इतर सर्वसामान्य मुंबईकरांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थसंकल्पात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल पंपावर मिळणारे पेट्रोल डिझेलच्या दरात घट करण्याचा निर्णय जाहिर केला. तसेच हा निर्णय १ …
Read More »NEET UG प्रश्नी संसदेत विरोधकांचा गोंधळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित सोमवारपर्यंत कामकाज तहकूब
भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार प्रस्ताव मांडला. एनईईटीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला. जनता दल JD(S) खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी NEET मुद्द्यावर सरकारचे समर्थन केले, तर अध्यक्ष जगदीप धनकड यांनी खासदार सागरिका घोष, डेरेक ओब्रायन आणि साकेत गोखले …
Read More »सुप्रिया सुळे यांचा लोकसभाध्यक्षांकडे NEET – UG पेपरफुटी प्रकरणी स्थगन प्रस्ताव पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा
राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट -युजी आणि युजीसी – नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष्यांकडे स्थगन प्रस्ताव सादर केला. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष …
Read More »नाना पटोले यांची टीका, …बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल, पण नक्कल करतानाही ७००० रुपयांची कमीशनखोरी
राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून हफ्ता वसुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन
पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ४५० ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात …
Read More »विखे-पाटील यांची माहिती, वाळू धोरणामध्ये सुलभता येणार विधानसभेत वाळू धोरणाबाबत दिली माहिती
राज्यातील जनतेला सहज व स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी शासन वाळू धोरणाची अंमलबजावणी करीत आहे. या धोरणामध्ये अधिक सुलभता आण्यासाठी शासन प्रयत्न करत असून, या धोरणातील बदलाबाबत काही सूचना आल्यास त्यांचा स्वीकार करून धोरणात सुधारणा करण्यात येतील, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, …महाराष्ट्राला अधोगतीकडे लोटण्याचे काम राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालवरून टीका
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यावरून महायुती सरकार आपल्या महाराष्ट्राला अधोगतीकडे लोटण्याचे काम करत आहे अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. आपल्या एक्स हँडलवर याबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. प्रदेशाध्यक्ष …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला संविधानावरील “सर्वात मोठा हल्ला” असल्याचे सांगत आणीबाणी जाहिर करणे हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे सांगितले. संसदेतील दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या बोलत होत्या. सार्वत्रिक निवडणुकांनंतर १८ व्या लोकसभेची …
Read More »लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ठरावावर काँग्रेसने व्यक्त केली नाराजी पत्र लिहित के सी वेणूगोपाल यांनी नाराजी व्यक्त केली
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आणीबाणीच्या विरोधात ठराव आणल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना काँग्रेसने म्हटले आहे की, राजकीय संदर्भ देणे, तेही पदभार स्वीकारण्याच्या दिवशी, “खूप धक्कादायक” आणि “संसदेच्या इतिहासातील आश्चर्य कारक” होता. “अध्यक्षांकडून असा राजकीय संदर्भ घेणे संसदेच्या इतिहासात आर्श्चयकारक आहे. नवनिर्वाचित सभापतींच्या ‘पहिल्या कर्तव्या’पैकी एक म्हणून अध्यक्षपदावरून येणारे हे आणखी …
Read More »नाना पटोले यांची टीका, महाराष्ट्र कर्जात डुबवला, २.५ लाख कोटींचे कर्ज लादले मुख्यमंत्र्यांकडील एमएमआरडीए तोट्यात कसे ?
महाभ्रष्टयुती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असून विकासाच्या नावाखाली कर्ज काढून भ्रष्ट मार्गाने मलिदा खाल्ला जात आहे. जागतिक बँकेसह इतर बँकांकडूनही कर्ज काढले आहे, महायुती सरकारने राज्यावर २.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे. एमएमआरडीए सारखा विभाग नफ्यात होता तोही आता तोट्यात आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतानाही घाट्यात …
Read More »
Marathi e-Batmya