राजकारण

काँग्रेस मागणार खर्चाचा हिशेब, महामंडळांना दिलेला निधी कुठे खर्च झाला? काय कामे झाली? हिशोब काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिक-यांना विचारणार

महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून आले आहे. दरडोई उत्पन्नात आघडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळाच देशात सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कृषी क्षेत्रात राज्याची मोठी पीछेहाट झाली असून राज्यावर ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. कॅगनेही राज्य सरकारच्या आर्थिक …

Read More »

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींची निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेकाफेकी लाखो रोजगार निर्मिती होत असेल तर अजूनही बेरोजगारांच्या फौजा कशा

मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. …

Read More »

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी, हुकूमशाही ‘जनसुरक्षा विधेयक’ त्वरित मागे घ्या विधेयकावर चर्चा करण्याऐवजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडले

महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ‘जनसुरक्षा अधिनियम, २०२४’ हे विधेयक सादर केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महायुती सरकारचा तीव्र निषेध करत असून लोकशाही हक्क तुडवणारे हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटीने केल्याची माहिती राज्य सचिव उदय नारकर यांनी दिली. राज्य सचिव उदय नारकर म्हणाले की, जनतेने निवडून दिलेल्या …

Read More »

नाना पटोले यांची टीका, कॅगने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यांचा फुगा फोडला विरोधकांच्या आक्षेपावर कॅगकडूनही शिक्कामोर्तब

महाभ्रष्ठ महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक आहे असून पुरवणी मागण्या व कर्जाचे सरकार समर्थन करत असले तरी कॅगने सरकारला इशारा दिला आहे तसाच इशारा विरोधी पक्षांनी महाभ्रष्टयुती सरकारला दिला होता परंतु विरोधकांच्या इशाऱ्याकडे …

Read More »

सात राज्यातील पोट निवडणूकीत इंडिया आघाडीला १० भाजपाला २ जागा १३ पैकी फक्त दोन जागा भाजपाला १ अपक्षाला

इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सात राज्यातील १० विधानसभेच्या जागा जिंकल्या, तर भाजपाने दोन आणि एक अपक्ष जिंकला, कारण या आठवड्याच्या सुरुवातीला सात राज्यांमधील १३ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांसाठी १३ जुलै रोजी मतमोजणी झाली. पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) मोहिंदर भगत यांनी जालंधर पश्चिम मतदारसंघात विजय मिळवला. तामिळनाडूमध्ये, विक्रवंडी विधानसभा मतदारसंघात …

Read More »

कापसाचे हेक्टरी उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे मत

तीन हजार वर्षांपूर्वी भारताने वस्त्राद्योगाचे ज्ञान जगाला दिले. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी कापसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण… हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत आहे असे 'कॅग'ही सांगतेय

काल कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहवालावर दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत जयंत …

Read More »

कॅगचे सरकारला खडेबोल, वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत कॅगने व्यक्त केली चिंता

नुकतेच राज्यातील महायुतीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्याचा अखेरचा दिवस काल शुक्रवारी झाला. मागील १० वर्षात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सातत्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा एकप्रकारे नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. तसेच प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या शेवटी दिवशी सरकारच्या जमा खर्चाबाबत राज्य सरकारचा ऑडिट रिपोर्ट अर्थात कॅग अहवालही सादर करण्यात …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल मध्ये आम्ही काँग्रेस आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट, तुमच्याकडचीही मतं आणली, पुढे आम्हीच सत्तेत महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार

विधान परिषदेच्या निवडणूकीनिमित्ताने १२ उमेदवार उभा करत महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेते म्हणत होते की, आमचा १२ उमेदवार निवडूण येणार म्हणून, पण या निवडणूकीत आम्हाला मिळणारी मते आम्ही मिळवलीच पण महाविकास आघाडीची मतंही आम्ही खेचून घेत ती आमच्याकडे आणली. त्यामुळे आता जी परिस्थिती आज दिसून आली. तीच परिस्थिती येणाऱ्या आगामी …

Read More »