राजकारण

अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिल पर्यंत कोठडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिल रोजी १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडी संपल्यानंतर त्याला दिल्लीच्या कोर्टात खचाखच भरलेल्या कोर्टरूममध्ये विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, …

Read More »

वंचितसह अपक्ष, लहान-मोठया पक्षाच्या उमेदवारांना ‘या’ चिन्हाचे वाटप

देशातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत काल संपली. तर महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची आणि मागे घेण्याची मुदतही संपली. या पाच लोकसभा मतदारसंघापैकी चार लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहिर केले. परंतु वंचित बहुजन आघाडी रोड रोलर, …

Read More »

आयकर विभागाने काँग्रेसला पाठविलेल्या नोटीसीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मागील महिनाभरात काँग्रेस पक्षाला आयकर विभागाने पाठविलेल्या दोन नोटीसींमधून २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील आयकर उत्पन्नातील तफावतीवरून एकूण ३ हजार ५६७ कोटी रूपयांचा दंड ठोठावला. त्यासंदर्भातील काँग्रेसला नोटीसही पाठविली. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सध्याच्या निवडणूकीचा काळ असल्याने …

Read More »

जयंत पाटील यांची टोला, … पण सत्तेसाठी लाचारी पत्कारणे योग्य नाही

लोकांनी उमेदवाराला खांद्यावर घेतले आणि निवडणूक लोकांनी हातात घेतली तर कोणतीही शक्ती त्या उमेदवाराचा पराभव करू शकत नाही. निलेश लंके हे स्थानिक आहेत, लोकप्रिय आहेत, सतत फिरतीवर असतात. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केले आहे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे. या लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली. राज्याच्या मुख्य …

Read More »

भाजपाची टीका, रामलीला मैदानावरचा मेळावा म्हणजे ‘भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा’

दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी झालेला इंडी आघाडीचा मेळावा हा भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा होता. या महामेळ्यात सहभागी झालेल्या नेतेमंडळींनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असा घणाघात भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. भाजपाचे …

Read More »

रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, रुग्णवाहिका खरेदीत मोठा भ्रष्टाचार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकामध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अवमान? काँग्रेसची टीका

मागील १० वर्षात केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून पंतप्रधान म्हणून असलेला एक राजशिष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच पाळला नसल्याची चर्चा आतापर्यंत सर्वाधिक काळ राहिली आहे. देशात नव्या संसद भवन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर देशाच्या घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना कार्यक्रमाला पाचारण केले नाही. तत्पूर्वी कर्तव्यपथ …

Read More »

महारॅलीत इंडिया अलायन्सचा नारा, भाजपाचा पराभव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा “दुरुपयोग” यासह अनेक मुद्द्यांवर “सुरक्षा” करण्यासाठी ३१ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘महारॅली’ आयोजित करण्यात आली होती. या महारॅलीसाठी इंडिया आघाडीतील सहभागी घटक पक्ष असलेले काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे, …

Read More »

वंचितची दुसरी यादी जाहिर, या ११ मतदारसंघातून उभे केले उमेदवार

राज्यातील महाविकास आघाडीबरोबरील जागा वाटपाच्या चर्चेत वंचित बहुजन आघाडीबरोबर योग्य तो तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर आणि नागपूर येथील लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात आठ उमेदवारांची यादी जाहिर केली होती. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने …

Read More »