महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ मार्च २०२६ रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. या सोहळ्यास विधानपरिषदेचे …
Read More »अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला डिवचलं, आता कुठे गेले तुमचे वाघ? मंत्री मार खातायत, साताऱ्यातील घटनेवरून खिल्ली उडविली
सातारा जिल्हा परिषद निवडणूकीतील रणनीतीवरून नैसर्गिक युतीतील भाजपा आणि शिवसेना ओएफसी वाद रंगल्याचे चित्र दिसायला लागले आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत व्हीप बजावण्यासाठी गेलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळातील सहकारी पक्षातील मंत्रीच या सत्तेसाठी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र पाह्यला मिळाले. दरम्यान याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »सातारा जि.प. निवडणूकीचे पडसाद विधिमंडळात, एकनाथ शिंदे यांनी सांगितले मार खान्याची गोष्ट नैसर्गिक युतीतल्या भाजपाच्या मारहाणीचे कथन शिवसेनाओएफसीकडून विधिमंडळात
राज्यात मूळ शिवसेना असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंड करत भाजपाबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी म्हणून तत्कालीन शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक मोठा गट भाजपाबरोबर गेला. सत्तेत गेला, सत्तेत रमला आणि आणि आता त्याच्या मिळणाऱ्या उबीतून बाहेर पडायलाही तयार होईना. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मतदानाला जात …
Read More »महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून कुस्ती रसिकांची मने जिंकली आहेत, असे गौरवोद्गार काढत या स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी …
Read More »जयकुमार गोरे यांची शंभूराज देसाई यांच्यावर टीका, पालकमंत्र्यांचे ‘आकांडतांडव’ पोलिसांची ‘छळवणूक’ थांबवा
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी आरोप केला की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड महालक्ष्मी सरस मध्ये १० कोटी रुपयाची विक्री, राज्यातील ३६ जिल्ह्यात उमेद मॉल
महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून महालक्ष्मी सरस हा प्रदर्शनाचा ब्रँड अधिक मजबूत होत आहे. राज्यात शंभर कोटी …
Read More »छगन भुजबळ यांची माहिती, राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा
राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी (Commercial LPG) पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम …
Read More »रामदास आठवले यांचे आश्वासन, मी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राह्यला तयार रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढे यावे
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथे केलेल्या पाण्याचा सत्याग्रह हा ऐतिहासीक आणि युगप्रवर्तक सत्याग्रह होता. सामाजिक विषमतेवर मात करुन समतेच्या युगाचा आरंभ करणारा चवदारतळे सत्याग्रह ठरला आहे. हा मानवमुक्तीचा संगर संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुढील वर्षी चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव संपूर्ण देशात साजरा करण्यात …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’,संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा हा ही कायदा न्यायालयात अडकून पडणार
‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६’वर कडक शब्दात टीका करत हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला . त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धार्मिक धर्मांतरांना आळा घालण्यासाठी प्रस्तावित केलेले हे विधेयक …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, चाकणकर यांचा राजीनामा झाला, पण मोठ्या माशांवर कारवाई झाली पाहिजे भोंदूबाबा खरात याचे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू, पोलिसांवर तपास करताना दबाव
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की, सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि खरात प्रकरणातून समोर आलेली मंत्र्यांची भोंदूगिरी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला काळिमा आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. …
Read More »
Marathi e-Batmya