राजकारण

वंचितकडून २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

काल दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अजेंडा चालवणाऱ्यांनाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजेंडा दिसू शकतो विद्यार्थ्यांना जनावरासारख्या मारहाणीचे देवेंद्र फडणवीस समर्थन करतात का? मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका

नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. २०१४ साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित

एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे (ता.मावळ) येथील तीन हेक्टर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे सदुंबरे येथील गायरानातील तीन हेक्टर जमीन एनडीआरएफला बाजारभावाने देण्यास मान्यता देण्यात आली …

Read More »

लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मान्यता

लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. लोक आयुक्त व उपलोक आयुक्त कार्यालयाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या दोन्ही कार्यालयांसाठी यापूर्वी ८७ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता. आता राज्य शासनाने केंद्र शासनाच्या …

Read More »

राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये एक वर्षाकरिता आकांक्षित तालुका कार्यक्रम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सन २०२६-२७ साठी आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नीति आयोगाने देशातील दुर्लक्षित व मागासलेल्या ११२ जिल्ह्यांमध्ये आकांक्षित जिल्हा कार्यक्रम व ५०० अल्प विकसित तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये राज्यातील …

Read More »

आषाढी वारी निमित्त सरकारकडून ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्यापक आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत असून, ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ ही …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही वारकऱ्यांसाठी सुविधा वाढविणार; शक्तिपीठ महामार्ग, रामरक्षा आंदोलन आणि रमेश म्हात्रे प्रकरणावरही स्पष्ट केली भूमिका

आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, वारकरी सेवा आणि लोकभावनेचा समतोल साधणारी भूमिका मांडत पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली. पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली असून …

Read More »

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ कुमार सप्तर्षी यांचे निधन पुण्यातील खासगी रूग्णालयात वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्ये, समाजवादी विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८५ वर्षी पुण्याच्या खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डॉ उर्मिला, मुलगा आणि सून असा परिवार आहे. डॉ कुमार सप्तर्षी यांना मधूमेहाचा त्रास होता. तसेच वयोमानामुळे त्यामुळे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य …

Read More »

जयंत पाटील यांची टीका,…शक्तीपीठ मात्र पंढरपूर पासून हा रस्ता २३ किलोमीटर दूर विकास म्हणजे नक्की काय? दोन मजलेवरून रस्ता जाणार, यावरून माल वाहतूक होणार. शेतकऱ्यांचा यात काय फायदा?

पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सद्बुद्धी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.‌ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिंडीत सहभागी होत सरकारवर जोरदार हल्ला केला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, सगळी देवस्थाने जोडणारा रस्ता म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असं सरकार म्हणतं मात्र सर्वात मोठे देवस्थान असलेल्या पंढरपूरपासून …

Read More »