राजकारण

उदय सामंत यांचे आश्वासन, मॉलमधील गेमिंग झोनच्या सुरक्षा निकषांचा राज्यव्यापी आढावा घेणार विधान परिषदेत ९२ अन्यये खालील चर्चेत दिलेले उत्तर

मुंबईसह राज्यातील सर्व मॉलमधील गेमिंग झोनमध्ये सुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत का, याचा राज्यव्यापी आढावा घेण्याच्या सूचना संबंधित आयुक्तांना देण्यात येतील. या आढाव्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईतील मॉलमधील सुरक्षेचे निकष न पाळणाऱ्या गेमिंग झोनविरुद्ध कारवाई …

Read More »

आमदार रईस शेख यांचा सवाल, समान नागरी संहिता समितीवर मुस्लिम समुदायाला प्रतिनिधित्व का नाही? समितीचे पुनर्गठन करण्याची मागणी

समान नागरी संहिता (युसीसी ) कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केलेल्या समितीमध्ये सर्व अल्पसंख्याक समुदायास योग्य प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसून या समितीमध्ये मुस्लिम समुदायाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. यासंदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, निकृष्ट आणि बोगस बियाणे प्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करा दोषी कंपन्यांना बियाणे विकण्याचे परवाने करणार रद्द- कृषिमंत्र्यांनी केली घोषणा

विदर्भातील अकोला, अमरावती आणि इतर जिल्ह्यांमध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणांमुळे हजारो शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मोठ्या प्रमाणावर पेरणी करूनही सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देत या बियाणांच्या कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पुढे बोलताना विजय …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, हाफकिन महामंडळात कोट्यवधींचा गैरव्यवहार कॅगच्या अहवालाने भ्रष्टाचार उघड, दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा

विधानसभेत हाफकिन महामंडळाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर अर्धा तासाच्या चर्चेद्वारे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील मनमानी कारभाराकडे राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच कॅगच्या ऑडिट इन्स्पेक्शन रिपोर्टमधील निष्कर्षांचा दाखला देत हाफकिन महामंडळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला. पुढे बोलताना जयंत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, कुंभमेळ्यासाठी नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा शेतकऱ्यांच्यावर प्रकल्प लादू नका, जबरदस्ती भूसंपादन करू नका

नाशिक जिल्ह्यात येऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी रिंगरोड प्रकल्प बनवण्यात येत आहे. पण या प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता, अलायन्मेंट बदल, शेतकऱ्यांवर दबाव आणि महिलांशी गैरवर्तन झाल्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते …

Read More »

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना त्या हिंदीतील वक्तव्यावरून केला सवाल कोणासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतून हिंदीतून भाषण

मिसिंग लिंक तयार होऊन दोन तीन महिने झाले नाही तोच पहिल्याच पाऊसात मिसिंग लिंगमध्ये धबधब्याचे स्वरूप पाह्यला मिळाले. या स्थितीवरून मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सरकारच्या कामावर टीकाही केली. मात्र २९३ च्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधकांच्या टीकेला प्रतित्त्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, आदिवासींना हक्काचा सातबारा वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू

वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना १२ ई लागू करण्यात आला आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील २ लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील लाखो आदिवासी आणि पारंपरिक वननिवासी बांधवांना याचा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची धमकी हा हुकूमशाहीचा प्रकार प्रश्न विचारणे सरकारची बदनामी आहे का ?

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील ७ हजार कोटींच्या मिसिंग लिंकला अवघ्या दोन महिन्यात खड्डे पडले, त्याचा धबधबा झाला व वाहतूक बंद करावी लागली, हा निकृष्ट कामाचा प्रकार आहे. एखाद्या प्रकाल्पावर प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना ‘भाडे के तट्टू’ कसे काय म्हणतात? सरकारला प्रश्न म्हणजे महाराष्ट्राची बदनामी कशी होते? प्रश्न विचारणाऱ्यांना सोडणार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न लढा सुरूच राहणार महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानभवन येथे महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची बैठक झाली बैठकीस या बैठकीला उच्चअधिकार …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, नमन, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी लोककलांचाही अनुदान योजनेत समावेश · दशावतारासह लोककला अनुदान दुप्पट; कलाकारांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होणार

विद्यमान लोककला अनुदान योजनेत नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार लोककला प्रकारांचाही समावेश करण्यात येणार आहे. या प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे वार्षिक १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा …

Read More »