राजकारण

अजित पवार यांचा हसत खोचक टोला, रिकाम्या खुर्च्याही या दोघांकडे… मंत्रिमंडळ विस्तारावरून लगावला टोला

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येवून एक महिना झाला. तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी वाटपावरून दिली ‘ही’ ग्वाही जनहिताची कामे थांबणार नाहीत

पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते …

Read More »

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्याचा प्रमुखच नियम तोडत असेल तर… शेतकऱ्यांना मात्र दुसरा प्राधान्यक्रम

विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला. मुख्यमंत्री मिरवणूका, …

Read More »

उध्दव ठाकरे यांना रामदास कदम यांचे प्रत्युत्तर, पण ते आता गुलाम… राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम कोण ?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेनेसह देशातील प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हणाले, भाजपासोबत जे गेले आहेत, त्यांच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण ते आता गुलाम झालेत, त्यांनी भाजपाची गुलामी पत्करली असे खोचक वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेची घोषणा, अण्णाभाऊ साठेंचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी पाठविणार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, या समाजघटकासाठी विनातारण कर्ज योजना राबवणार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शासन स्वतः केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चेंबूर येथील फाईन आर्टस् …

Read More »

अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबूर येथे उद्यानातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मागितली माफी राज्यपाल कोश्यारी यांनी क्षमा करण्याची राज्यातील जनतेला विनंती

दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथील रस्त्याचे नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणे येथून गुजराती-राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट वगळता सर्वच राजकिय पक्षांनी तीव्र शब्दात राज्यपालांच्या या वक्तव्याचा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठविणार राज्यातील प्रत्येक लाभार्थ्यास पत्र केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनी देखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचवा, आपली कार्यक्षमता वाढवतांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तसेच योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्यातील …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये नाही तर अवस्था… सत्तेचा फेस गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल

देशात ६०-६५ वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. मात्र आजची त्यांची अवस्था पाहिली की आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये असा खोचक टोला भाजपासह बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावत जे हमाम मे… म्हणून सगळे तिकडे गेलेत. त्या सर्वांच्या शरीरावर सत्तेचा जो फेस आहे तो निघून गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल असा इशाराही शिवसेना …

Read More »

अर्जून खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मंत्री दानवे म्हणाले, त्यांनी विधानसभा… ती जागा भाजपाचीच

मागील काही वर्षात जालना आणि औरंगाबादेतील सत्ता संघर्षावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर हे आमने-सामने आले. मात्र आता अर्जून खोतकर यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर दिल्लीला जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या उपस्थितीत दानवे यांच्याबरोबर समझौता केला. तसेच एकनाथ शिंदे गटात प्रवेशही केला. …

Read More »