सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर केवळ वीस …
Read More »न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले,…या सारखे समाधान नाही ओबीसी आरक्षणप्रकरणी केलेल्या कामाबाबत व्यक्त केले समाधान
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने गदा आणली. त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून त्यावेळी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवित राज्य भरात आंदोलनाचा सपाटाच लावला. तसेच ओबीसी आरक्षणावरून अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने अखेर राज्यातील ओबीसींना न्याय देत काढून घेतलेले …
Read More »न्यायालयाच्या निकालानंतर अतुल लोंढे म्हणाले, दोघांचे मंत्रिमंडळ आणि विस्तार टांगणीवरच विरोधी पक्ष संपवणे व सत्तेसाठी भाजपाकडून लोकशाहीचे धिंडवडे
भारतीय जनता पक्षाने राज्यातील विरोधी पक्ष संपवून सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकशाहीचे धिंडवडे काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून न्यायालयाच्या ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यामुळे सध्यातरी शिंदे–फडणवीसांचे असंवैधानिक सरकार दोघांचेच राहिल व मंत्रिमंडळ विस्तारही करता येणार नाही तसेच महत्वाचे निर्णयही घेता येणार नाहीत, असा खोचक टोला काँग्रेसचे मुख्य …
Read More »लोकशाही आणि संविधानाला धाब्यावर बसवित मोदी सरकारची हुकूमशाही मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात उद्या गुरुवारी राज्यभर काँग्रेसचे तीव्र आंदोलन !: नाना पटोले
लोकशाही मुल्ये व संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा हुकूमशाही कारभार सुरु असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांचा छळ करण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सर्रास केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा …
Read More »ओबीसी आरक्षण: दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
मागील दोन वर्षापासून कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा इम्पिरिकल डेटा सादर केला गेला नव्हता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र महाराष्ट्र सरकार आणि सर्व राजकिय पक्षांनी आरक्षणाशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे थ्री टेस्ट पूर्ण करत बांठिया …
Read More »संजय राऊत ट्विट करत म्हणाले, पीठ से निकले खंजरों को गिना जब… बंडखोर खासदारांवर टीका करत फुटीरावर शायरीतून निशाणा
राज्यात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांनंतर आता १२ खासदारही शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. तत्पूर्वी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. या साऱ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ते माझे सहकारी होते. त्यांनी …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले, सकाळचा मॅटनी शो बंद झाला, त्याची दखल… संजय राऊतांवरील प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा टोला
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित पक्षातील ५० आमदारांना सोबत घेवून राज्यात भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यानंतर खासदारांना आपल्या गटात सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर आले. आज दुपारी १२ खासदारांना आपल्या गटात सहभागी करून घेतल्यानंतर त्या १२ खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे हे …
Read More »शेवाळे यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, नियमामध्ये उत्तर बसत नाही पूरपरिस्थितीबाबत पत्रकार परिषद असल्याचे सांगत बोलणे टाळले
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारत वेगळी चूल मांडली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, माजी नगरसेवक आणि माजी नेते आणि खासदार शिंदे गटात सहभागी होत आहेत. यापार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या १२ खासदारांनी प्रवेश करताना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना-भाजपा युतीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र …
Read More »राष्ट्रवादीने दिले रामदास कदम यांना प्रत्युत्तर, विश्वासघात योग्य असल्याचे… शिवसेना फोडली... ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न रामदास कदम व बंडखोर नेत्यांचा आहे - महेश तपासे
बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली… मातोश्रीला दगाफटका केला… ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम व काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. २०१९ मध्ये पवारसाहेबांनी राष्ट्रवादी – शिवसेना …
Read More »अखेर माजी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी संबधित एका प्रकरणात ईडीने केली कारवाई
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयाने(ईडीने) मंगळवारी दिल्लीत अटक केली. ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) गैरव्यवहार व दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पांडे यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडीकडून तपास सुरू होता. संजय पांडे यांचे कुटुंबिय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी …
Read More »
Marathi e-Batmya