राजकारण

उद्धव ठाकरे यांचा आरोप, नुकसान भरपाई पीक विमा २ किंवा ३ रूपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांशी साधलेला संवाद

शेतकरी भोळाभबाडा आहे. इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती मराठवाडय़ात आली. हेक्टरी ५० हजार मिळालाय पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. मी कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली. राज्य सरकारकडे कर्जमुक्ती साठी संपूर्ण यंत्रणा आहे. परदेशी समिती स्वदेशी शेतकर्‍यांची वाट लावणार आहे. पॅकेज ही थट्टा आहे. नुकसान …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’ सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे काम, आता जनताच धडा शिकवेल

मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून …

Read More »

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून एकूण २९० पदांची भरती आयबीपीएस मार्फत केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mjp.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार ·त्वरित २०० पिंजरे बसविणार, आणखी १ हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी २०० पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतले २१ निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक आज झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळात एकूण २१ निर्णय घेण्यात आले. यातील काही निर्णय हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून घेण्यात येत आले आहेत. त्यामुळे आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही निवडणूका …

Read More »

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मंजूरी

सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या प्रकल्पाला राज्य शासनाची दिलासादायक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी अनर्जित, नजराणा रक्कमेसह अकृषिक वापर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे …

Read More »

हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या उपमार्गिकांना शासनाची मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री तथा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द राज्यातील ४९ लाख तुकड्यांचे व्यवहार होणार नियमित

राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय क्षेत्रावरील जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत राज शासनाने नुकताच एक अध्यादेश जारी केला असून या अध्यादेशामुळे १५ नोव्हेंबर १९६५ पासून तुकडेबंदी कायद्यामुळे अडकलेली घरे आणि प्लॉट कायदेशीर करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

माविमच्या ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’च्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महिलांना स्थानिक जागी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोहा येथे नवतेजस्विनी गारमेंट युनीटचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक बळकट होण्यास सहाय लाभणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या नवउद्योगात सहभागी होणाऱ्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास …

Read More »

दिनेश वाघमारे यांची घोषणा, २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान ३ डिसेंबर २०२५ मतमोजणी- राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान; तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत …

Read More »