डॉ उदय सामंत यांची माहिती, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी जाहिर केला निर्णय

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.

मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारने शासकीय पत्रव्यवहार व माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते. मात्र, राज्य स्थापन झाल्यानंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असून, १ मे, १९६६ पासून वर्जित प्रयोजनांव्यतिरिक्त सर्वच शासकीय कामकाज मराठीतच करण्यात येत आहे. त्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत हिंदीचा वापर फारसा होत नसल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा सुरू ठेवणे संयुक्तिक ठरत नाही, असे नमूद केले.

पुढे बोलताना डॉ उदय सामंत म्हणाले की, यासंदर्भात शासन स्तरावर चर्चा सुरू असून भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याची मागणी मराठी भाषा विभागाकडे करण्यात आली होती. या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून, अंतिम धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

अंतिम निर्णय होईपर्यंत भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचे भाषा संचालक अरूण गिते यांनी कळविले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *