सामाजिक

इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांची संख्या वाढविणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी …

Read More »

कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ योजना प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार- कामगारमंत्री सुरेश खाडे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी यावे महिनाभरात आरक्षण द्या

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान या बैठकीच्या ठराव प्रत आज माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे …

Read More »

मराठा आरक्षण इतिहास मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेला लेख

प्रस्तावना भारतीय समाजातील शोषण, विषमता व ब्राम्हणवाद लक्षात घेऊन सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वहारा वंचित समाजाला प्रत्येक ठिकाणी हक्काचे आरक्षण मिळावे अशी मागणी सरकारकडे केली होती . इंग्रजांनी सन १८७२ पासून आय सी एस परिक्षा सुरू केल्या होत्या . जगातील पहिले ५०% आरक्षण राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ मध्ये …

Read More »

पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी गणेशोत्सव काळासाठी राज्य सरकारचा निर्णय

गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते …

Read More »

महिलांना रोजगाराच्या संधीसह स्वच्छ, सुरक्षित इंधन पुरविण्यासाठी ‘उमेद’ पुढाकार घेणार ‘उमेद’ आणि हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित यांच्यात सामंजस्य करार केल्याची रूचेश जयवंशी यांची माहिती

ग्रामीण कुटुंबांतील बचत गटाच्या महिलांना रोजगाराच्या संधीसह स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरवठा व्हावा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) च्या समूदाय संसाधन व्यक्तींना अधिकचे उत्पन्न व्हावे या हेतूने उमेद आणि हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित (HPCL) यांच्यातील सामंजस्य करार मैलाचा दगड ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी रुचेश …

Read More »

राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नाशिक विभाग अध्यक्षपदी शरद तांबेंची नियुक्ती नाशिक विभाग अध्यक्ष पदाची धुरा

महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील संपादक शरद  तांबे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. शरद तांबे यांचे महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी नुकतेच दिले आहे. पत्रकारांच्या न्याय व …

Read More »

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी मान्य

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो …

Read More »

रात्रीच्या उशीराच्या बैठकीनंतरही मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम दुरूस्तीचा शासन निर्णय आल्याशिवाय उपोषण मागे नाहीच

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जालना येथील आंतरवली सराटे गावी मनोज जरांगे पाटील सुरु केलेल्या उपोषणाच्या आंदोलनाचा १२ वा दिवस आहे. या १२ दिवसात कुणबी समाजातील नागरिकांनाही मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच कुणबी असलेल्यांना मराठा असल्याचे जात प्रमाण पत्र देण्याची मागणीही केली. मात्र …

Read More »

धनगर आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडाऱ्याची उधळण भंडाऱ्याची उधळण झाल्याचा आनंदच- विखे पाटील यांची संयमाची भूमिका

मराठा समाजाला कुणबी समाजाचे आरक्षण देण्याचा मुद्दा गाजत असतानाच राज्याचे महसूलमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज सोलपुरात धनगर समाजाच्या आरक्षणावरून या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने विखे पाटील यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगावर भंडारा टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सुरक्षा यंत्रणेत …

Read More »