सामाजिक

महा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेत १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर …

Read More »

आमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज माकप नेते सीताराम येचुरी यांचे मत

नवी दिल्ली / मुंबई: प्रतिनिधी आमूलाग्र सामाजिक परिवर्तन ही काळाजी गरज बनली आहे असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने आयोजित केलेल्या ‘ महाराष्ट्राचे दीपस्तंभ ‘ या ऑनलाईन व्याख्यानमालाचे समारोपाचे पुष्प गुंफताना केले. ‘ प्रबोधन आणि समाजवाद ‘ हा …

Read More »

हरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात कमावती व्यक्ती गेलेल्यांनी या संस्थेच्या फोनवर संपर्क साधा

अहमदनगर: प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  घरातील कमावता हात गमावलेल्यांचे अक्षरशः आभाळ हरवले. तथापी मुंबई येथील स्व. विश्वनाथराव बिरेवार फाउंडेशन ट्रस्ट अशा परीवारांचा अनामप्रेम संस्थेच्या माध्यमातून सोबती बनला आहे. तूर्त तातडीचा आर्थिक सहयोग बिरेवार फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून दिला जात आहे. तथापि अशा परीवारांत नवा कमावता हात निर्माण होईपर्यंत त्यांची सोबत करण्याचा निर्धार अनामप्रेम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी …

Read More »

साईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढले गौरवोद्गार

अहमदनगर: प्रतिनिधी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनसाठी …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय: या बालकांची जबाबदारी आता राज्य सरकारवर जिल्हा स्तरावर टास्क फोर्स-महिला व बालविकास विभागाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोवीड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. …

Read More »

आदिवासी विभागाच्या वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना प्रवेश आदीवासी मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ८ वी ते १२ वी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाबाबत परिस्थिती पाहून आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये प्रवेश देण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी सांगितले. कोवीड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत टप्प्याटप्प्याने शाळा तसेच …

Read More »

दिव्यांग, नेत्रहीन मुलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना आर्ट इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून केले अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टीच्या गुजराती सेलतर्फे आर्ट इन्स्टॉलेशन कार्यक्रम पार पडला. गुरुवार १९ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, नरीमन पॉईंट, मुंबई येथे आर्ट इन्स्टॉलेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. कागदी झेंडे, सूत, लाकूड, लोकर अशा पर्यावरणपूरक साधनांमधून हे …

Read More »

आदिवासी समाजातील १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सरकारची खास योजना प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू आदिवासी आयुक्तांकडून परिपत्रक जारी

नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात. याअनुषंगानेच आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा तसेच इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू करण्यात आली …

Read More »

लोकशाहीवादी विचाराच्या प्रसारासाठी झटणारे माजी न्या.पी.बी.सावंत यांचे निधन वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेः प्रतिनिधी देशातील लोकशाही विचार जीवंत रहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतरही सातत्याने सामाजिक जीवनात सक्रिय राहिलेल्या माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत यांचे आज सकाळी राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्यावर उद्या सकाळी बाणेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९८९ साली न्यायमुर्ती सावंत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदी निुयुक्ती …

Read More »

यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ पठारेंना मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषा विभागाचे विंदा करंदीकर जीवनगौरव, श्री. पू. भागवत, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक हे चार पुरस्कार अनुक्रमे रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशन, डॉ.सुधीर रसाळ व संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री …

Read More »