पाकिस्तानातून करण्यात येत असलेल्या भारता विरूद्धच्या दहशतवादी कारवायांविरोधात आणि ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा मिळविण्यासाठी भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामाबादला एकटे पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली. मात्र या यादीत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह अन्य ७ खासदारांची नावे भाजपाने परस्पर समाविष्ट केली. त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे. तर काँग्रेसने या केंद्र सरकारने परस्पर समाविष्ट केलेल्या शिष्टमंडळातील खासदार शशी थरूर यांच्या नावावर पक्षाच्या वतीने पाठविलेल्या यादीत फुली मारली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सात शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये लोकसभा खासदार शशी थरूर यांचा समावेश आहे, जे परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. केंद्र सरकारने शशी थरूर, त्यांचे लोकसभा सहकारी मनीष तिवारी आणि अमर सिंग आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांना शिष्टमंडळांचा भाग होण्यासाठी संपर्क साधला होता.
Yesterday morning, the Minister of Parliamentary Affairs Kiren Rijiju spoke with the Congress President and the Leader of the Opposition in the Lok Sabha. The INC was asked to submit names of 4 MPs for the delegations to be sent abroad to explain India's stance on terrorism from…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 17, 2025
परंतु केंद्र सरकारने शिष्टमंडळ प्रमुखांची नावे जाहीर केल्यानंतर लगेचच काँग्रेसने जाहीर केले की, पक्षाने सरकारला माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील पक्षाचे उपनेते गौरव गोगोई आणि खासदार सय्यद नसीर हुसेन आणि अमरिंदर सिंग राजा वारिंग यांची नावे सुचवली आहेत. काँग्रेसने सुचवलेल्या यादीत शशी थरूर यांचे नाव नाही आणि तिवारी, खुर्शीद आणि सिंग यांचीही नावे नाहीत.
In moments that matter most, Bharat stands united.
Seven All-Party Delegations will soon visit key partner nations, carrying our shared message of zero-tolerance to terrorism.
A powerful reflection of national unity above politics, beyond differences.@rsprasad @ShashiTharoor… pic.twitter.com/FerHHACaVK— Kiren Rijiju (@KirenRijiju) May 17, 2025
तर शशी थरूर यांनी स्पष्ट केले की, ते राष्ट्रीय हितासाठी या शिष्टमंडळात भाग घेतील. “भारत सरकारने अलीकडील घटनांबद्दल आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावरील पाच प्रमुख देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचे आमंत्रण दिल्याने मला सन्मानित वाटत आहे. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या सेवा आवश्यक असतात तेव्हा मी कमी पडणार नाही. जय हिंद!” असे एक्स X वर पोस्ट केले.
इतर तीन नेत्यांपैकी दोन नेत्यांच्या जवळच्या सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला सूचित केले की, जर केंद्र सरकारने त्यांना शिष्टमंडळांचे सदस्य म्हणून नाव दिले तर ते देखील जातील. काँग्रेस नेत्यांच्या एका गटाला आश्चर्य वाटले की काँग्रेसच्या संपर्क विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांना पक्षाने सुचवलेली नावे का जाहीर करावी लागली, जरी त्यांनी मान्य केले की ही नावे सुचवणे हा पक्षाचा विशेषाधिकार आहे.
“काल सकाळी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळांसाठी काँग्रेसला ४ खासदारांची नावे सादर करण्याची विनंती केली होती. काल १६ मे रोजी दुपारपर्यंत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र लिहून काँग्रेसच्या वतीने खालील नावे दिली. आनंद शर्मा, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री, गौरव गोगोई, उपनेते, काँग्रेस खासदार, सय्यद नसीर हुसेन, खासदार, राज्यसभा आणि राजा ब्रार, खासदार, लोकसभा यांची नावे,” जयराम रमेश यांनी एक्स X वर पोस्ट केले.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, केंद्र सरकारच्या यादीमुळे काँग्रेस पक्षाला “धक्का” बसला आहे आणि पक्षाला “ही नावे अंतिम यादीत समाविष्ट होतील” अशी आशा आहे.
“पुढे काय होईल, मी सांगू शकत नाही. नावे वेगळी आहेत. आम्ही आमचे कर्तव्य बजावले. आम्हाला आशा होती की, सरकार प्रामाणिक हेतूने नावे मागत आहे. आम्हाला माहित नव्हते की ते हे एका चुकीच्या मानसिकतेने करत आहेत, असा आरोपही जयराम रमेश यांनी केला.
“यावरून पक्षातील तुटलेली समीकरणे दिसून येतात,” असे एका नेत्याने सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरनंतर शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनी लष्करी कारवाई, युद्धबंदीची घोषणा आणि राजनैतिक आधारांवर बारकाईने भाष्य केले होते. शशी थरूर यांच्या जाहीर घोषणांमुळे पक्षाचा एक भाग नाराज होता कारण त्यांना ते केंद्र सरकारच्या रणनीतीला पाठिंबा देताना दिसत होते. इतके की, या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीत पक्षाच्या नेतृत्वाच्या बैठकीनंतर, नाव न सांगण्याच्या अटीवर एका नेत्याने माध्यमांना सांगितले की, शशी थरूर यांनी “लक्ष्मण रेखा (लाल रेषा)” ओलांडली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “युद्धविराम” करण्याच्या मध्यस्थीबद्दल केलेल्या पोस्टबद्दल निराशा व्यक्त करणाऱ्या शशी थरूर यांच्या ‘एक्स’ वरील पोस्टबद्दल विचारले असता, भारताने कोणत्याही परदेशी राष्ट्राला मध्यस्थी करण्याची विनंती केली नव्हती आणि करण्याची शक्यताही नव्हती, असे जयराम रमेश यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. “वो उनकी राय है। जो शशी थरूर साहेब बोलते हैं वो पार्टी की राय नही होती है (हे त्यांचे मत आहे. शशी थरूर जे म्हणतात ते पक्षाचे मत नाही).”
I am honoured by the invitation of the government of India to lead an all-party delegation to five key capitals, to present our nation’s point of view on recent events.
When national interest is involved, and my services are required, I will not be found wanting.
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/b4Qjd12cN9
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 17, 2025
शशी थरूर म्हणाले की रमेश “पूर्णपणे बरोबर” होते आणि ते “पक्षाचे किंवा सरकारचे प्रवक्ते नव्हते”. “काहीही असो, लोकांना असे वाटते की मला या विषयांबद्दल काही माहिती आहे. म्हणून, ते येतात आणि माझे विचार विचारतात. आणि मी हे अगदी स्पष्टपणे सांगतो, कधीकधी अप्रत्यक्षपणे आणि कधीकधी स्पष्टपणे, की मी एक भारतीय म्हणून, एक अभिमानी नागरिक म्हणून माझे वैयक्तिक विचार व्यक्त करत आहे. आणि हे विसरू नका की माझ्या स्वतःच्या पक्षाने या संघर्षाच्या सुरुवातीलाच सरकार आणि सशस्त्र दलांशी पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता,” असेही यावेळी सांगितले
काँग्रेस नेत्याने “लक्ष्मण रेखा” ओलांडल्याच्या केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, शशी थरूर म्हणाले की, हे कोणतेही पुरावे नसलेले केवळ माध्यमांचे काम आहे. “मला माहित नाही की हे कुठून येते. मी काल काँग्रेस कार्यकारिणीच्या नेत्यांच्या बैठकीला होतो. संध्याकाळी ४.३० वाजता सुरू झालेल्या बैठकीत मी संध्याकाळी ६.३५ वाजेपर्यंत तिथे होतो आणि मला हे सांगावे लागेल की त्यावेळी याचा कोणताही संदर्भ नव्हता आणि माझा कोणताही संदर्भ नव्हता,” असेही यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसने आनंद शर्मा यांचे नाव सुचवले असले तरी, सरकारच्या यादीत त्यांचे नाव नाही. शर्मा हे माजी कॅबिनेट मंत्री आहेत – ते यूपीए २ मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्री होते – आणि त्यांना शिष्टमंडळांपैकी एकाचा सदस्य म्हणून समाविष्ट केले जाईल की नाही आणि ते त्यात सामील होण्यास सहमत होतील की नाही हे पाहावे लागेल.
Marathi e-Batmya