गेले अनेक वर्षे झुंज देणे , प्राणपणाने सामना करणे हे माझ्या सवयीचे झाले आहे ! ‘संघर्ष’ शब्द टाळला कारण तो आता कोणिही वापरतं !! पण हजारो लाखो लोक काय म्हणतात हे ऐकण्याची पद्धत काय ,त्याची मानकं काय ???लोकांची भाषा समजावून सांगणारा ट्रान्सलेटर कोण ?? …लोकांचे कान, लोकंच शब्द, लोकांच परिणाम …
Read More »एम.पी. मिल प्रकरणानंतरही नगरविकास विभागाच्या धोरणात स्पष्टता नाहीच ३०० चौ.फु.चे घराबाबत एसआऱएला अहवाल सादर करण्याचे गृहनिर्माण विभागाचे आदेश
मुंबईः प्रतिनिधी ताडदेव येथील एसआरएच्या प्रकल्पातील रहिवाशांना वाढीव स्वरूपाचे बांधकाम देण्याच्या निर्णयात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संशयाच्या भोवऱ्यात आले. तरीही मुंबईचा सुधारीत विकास आराखड्यास मंजूरी देताना झोपडपट्टी पुर्नविकास योजनेतील घरे २६९ चौरस फुटाची देण्याऐवजी ३०० चौरस फुटाची घरे देण्याची तरतूद नगरविकास विकास विभागाने आराखड्याच्या नियमावलीत …
Read More »अहो अधिकाऱ्यांनो कामे करा नाहीतर मंत्र्यांना लोक शिव्या घालतील पीए, ओएसडींची जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना विनंत्या
मुंबईः प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारला ४ वर्षे पूर्ण झालेली असून डिसेंबर ते मार्च दरम्यान लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीच्या सोबतच राज्यातील विधानसभेच्या निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने सर्वच मंत्र्यांच्या पीए, ओएसडी आणि खाजगी सचिवांकडून मंत्र्याकडे गाऱ्हाणी घेवून येणाऱ्या लोकांची कामे करावीत यासाठी त्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ …
Read More »म.गांधींच्या जयंती दिनीच मंत्रालयात स्वच्छतेचे तीन तेरा लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची दुरावस्था
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक घराघरात स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिन स्वच्छता दिवस म्हणून पाळण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु मंत्रालयातील स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी भाजपच्या लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्वच्छतेचीच दुरावस्था झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संपूर्ण राज्याचा कारभार मंत्रालयातून चालविला जातो. …
Read More »शासकिय कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख मिळणार जि.प., विद्यापीठ, अनुदानीत संस्थामधील कर्मचाऱ्यांनाही लागू होणार सरकारचा शासन निर्णय लागू
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या कायद्यानुसार २००५ सालानंतर शासकिय सेवेत रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन योजनेऐवजी अंशदान पेन्शन योजना लागू होते. त्यामुळे सरकारी नोकरदारांना निवृत्तीवेतन तुटपुंजे मिळते. तसेच त्याचे अकाली निधन झाले तरी त्याच्या कुटुंबियांनाही फारसी सरकारी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शासकिय नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे कामाला लागून १० वर्षाच्या आत …
Read More »‘सर्वांसाठी घरे’ योजना कंत्राटी अभियंत्याच्या हातात पंतप्रधान आवास योजनेसाठी १६०० कंत्राटी अंभियंते घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वसामान्य नागरीकांना आणि प्रत्येकाला घर देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे अर्थात पंतप्रधान आवास योजनेची घोषणा केली. मात्र सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पुरेसे अभियंते नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारकडून १६०० कंत्राटी अभियंते नियुक्त …
Read More »एससी-एसटीला पदोन्नतीत आऱक्षण देण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाने मागासवर्गीय आणि आदीवासी कर्मचाऱ्यांमध्ये आशादायक वातावरण
नवी दिल्लीः प्रतिनिधी शासकिय सेवेतील एससी, एसटी समाजातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देणे कायद्याने बंधनकारक नाही. मात्र राज्य आणि केंद्र सरकारची इच्छा असेल तर एससी-एसटी समुदायातील शासकिय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देवू शकतात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने दिला. तसेच २००६ चे नागराज खटल्यातील …
Read More »महसूल सचिवांचा विरोध तर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा घाट शासकिय जमिनी मालकी हक्काने देत सरकार २८ हजार कोटींवर पाणी सोडणार
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीत जमिन खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होते. परंतु या शासकिय जमिनी बिल्डरांच्यां फायद्यासाठी नाममात्र शुल्क आकारून मालकी हक्काने देण्याचा घाट राज्य सरकार कडून आखण्यात येत आहे. विशेष म्हणजे या नाममात्र शुल्क आकारणीचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून घालण्यात येत असून त्यास …
Read More »पर्यावरणाच्या रक्षणासाठी यंदा टिश्यु पेपर गणरायाची निर्मिती शाडू आणि पीओपीच्या गणरायाच्या मुर्तीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध
मुंबई : प्रतिनिधी ग्लोबल वार्मिंग आणि समुद्र, नदी-नाल्यांमधील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या पर्यांवरणाच्या रक्षणासाठी विर्ले-पार्ले येथील संकेश रेणूके यांनी आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी माफक दरात टिश्यू पेपरपासून गणरायाची निर्मिती करून त्यास हातभार लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विर्ले-पार्ले येथील …
Read More »१५ लाख घरे कधी बांधणार ? केंद्राची राज्याला विचारणा पत्र लिहून राज्य सरकारला फटकारले
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्यावतीने देशातील प्रत्येकाला घर मिळावे या उद्देशाने पंतप्रधान आवास योजना जाहीर करून दोन वर्षे पूर्ण झाली. तरी राज्यात अवघ्या पाच लाख घरांनाच मंजूरी देत अवघी २ लाख घरे बांधून पूर्ण केल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला चांगलेच फटकारले असून उर्वरित १५ लाख घरांच्या योजनेला मंजूरी देवून ती …
Read More »
Marathi e-Batmya