मुंबई : प्रतिनिधी देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित नागरिकांना राज्यात देण्यात आलेल्या जमिनी व मालमत्ता हस्तांतरण व वापर यावरील निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. अशा निर्वासित नागरिकांना देण्यात आलेल्या भूखंडांच्या नोंदणीवर अ-१ सत्ता प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ अशी नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या जमिनींचे मालक हे …
Read More »विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना आवश्यक मनुष्यबळ द्या विकास मंडळांच्या आढावा बैठकीत राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित …
Read More »समस्त सोलापूरकरांच्या सहभागाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता मिरवणूकीत ७ ते ८ लाख आंबेडकरी अनुयांची उपस्थिती
सोलापूर : प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गेले आठवडाभर सुरु असलेल्या जंयती उत्सवाची सांगता काल रविवारी झाली. जंयतीनिमित्त रविवारी काढण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती मध्यवर्ती समितीच्या मिरवणूकीत तब्बल १०० हून अधिक मंडळांनी सहभाग घेतला. सकाळी मोठ्या जल्लोषात सुरु झालेली मिरवणूक रात्री १२ वाजता संपली. या मिरवणूकीत तब्बल ७ …
Read More »बोधचिन्ह, घोषवाक्य निर्मितीसाठी स्पर्धा विजेत्यास २५ हजाराचे बक्षीस मिळणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेला पारदर्शक, कालबद्ध आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (RTS) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या क्रांतिकारी कायद्यामध्ये आजवर ३९ विभागांच्या ४६२ सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. सामान्यांना आपले सरकार संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा …
Read More »वीज बचतीच्या ‘स्पर्शा’ने सरकारची ९३ लाख रूपयांची बचत राज्यातील १२६९ इमारतीत ऊर्जा उपकरणे बदलली
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या ‘स्पर्श’ (सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब) प्रकल्पांतर्गत राज्यातील १२६९ शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या आहेत. त्यामुळे १ एप्रिल पर्यंत सुमारे दहा लाख युनिट विजेचा वापर कमी झाला तर विज बिलापोटीचे ९२.६८ लाख रुपयांची बचत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतींमधील दोन लाख ट्यूबलाईट, ७५ हजार पंखे व १६०० वातानुकुलित यंत्रे बदलण्यात …
Read More »यंदाच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची धुरा संगीत रंगभूमीच्या अभिनेत्रीकडे किर्ती शिलेदार बनल्या ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीच्या धामधुमीनंतर निवडून आलेल्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत आज ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यंदाच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जयमाला आणि जयराम शिलेदार यांच्या कन्या असणाऱ्या किर्ती यांनी आपल्या बहारदार आवाज आणि अभिनयाच्या …
Read More »महाराष्ट्राला १५ पंतप्रधान पुरस्कार ११ वर्षात ८ योजनांच्या क्षेत्रात पुरस्कार मिळाले
नवी दिल्ली : प्रतिनिधी लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून लोकप्रशासनाचे उत्तम उदाहरण स्थापित करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी २१ एप्रिल या …
Read More »भ्रष्ट आणि घोटाळेबाज राजकारण्यांची मालमत्ता लवकरचं सरकार जमा होणार पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याच्या हालचाली
मुंबई : गिरिराज सावंत लोकसेवक तथा लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनातील व्यक्तींकडून संगनमताने सरकारी निधींमध्ये भ्रष्टाचार करण्याचे प्रकार राजरोस करण्यात येण्यात येतात. मात्र आता अशा भ्रष्ट आणि घोटाळ्यातून मालमत्ता कमाविणाऱ्या लोकसेवक अर्थात लोकप्रतिननिधींची मालमत्ताच सरकार जमा करण्यात येणार असून आगामी पावसाळी अधिवेशनात ही या संबधिचे विधेयक विधिमंडळाच्या विधान परिषद आणि विधानसभेत मंजूर …
Read More »महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात शेतकऱ्यांचे मंत्रालयाच्या दारात आंदोलन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उस्मानाबादच्या शेतकऱ्यांचे भाजी फेको आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी शेतीमालाला चांगली बाजार पेठ मिळावी आणि किंमत मिळावी या उद्देशाने उस्मानाबादहून मुंबईत येवून भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि मुंबई पोलिसांनी अटकाव केला. त्यामुळे या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टेम्पोतून भाजी आणून भाजी फेको आंदोलन केले. यामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सदर शेतकरी …
Read More »रूस्तुम ए-हिंदचे स्वप्न सत्यात उतरविणारा सुवर्ण पदक विजेता मल्ल राहुल आवारे कॉमनवेल्थ गेम्स मधील सुवर्णपदकाने बीडसह महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर
मुंबई : प्रतिनिधी आज केवळ महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानच्या कुस्ती क्षेत्रासाठी सोन्याचा दिवस आहे. पैलवान राहुल आवारे याने ५७ किलो वजनी गटात तुल्यबळ लढती जिंकत सुवर्णपदक मिळवले. राहुलचे यश हे खरोखर असाधारण असे आहे. रूस्तुम ए-हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार मामांनी बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातल्या या पोराला पोटाशी धरून पुण्यात आणले …
Read More »
Marathi e-Batmya