नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरु नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, …हे कोणत्या कायद्यात बसते? माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा
मागील तीन-चार दिवसांपासून संसदेत राज्यघटना स्विकारण्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेचा पहिला टप्पा लोकसभेत काल पुर्ण झाला. राज्यसभेत उद्यापासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत …
Read More »शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार
शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत प्रथेप्रमाणे राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे शिवसेना उबाठाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. नागपूरात उद्या सोमवारपासून …
Read More »शिवसेना उबाठाच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मंदिर हटविण्याचे आदेश मागे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश: दादर हनुमान मंदिर सुरक्षित
दादर पूर्व रेल्वे स्टेशन लगत साधारणतः ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वेच्या जागेवर असल्याने त्याला हटविण्याचे आदेश रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आले. त्या आदेशावरून नुकतेच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या मंदिर हटविण्याला विरोध दर्शवित हेच का भाजपाचं हिंदूत्व असा सवाल केला. तसेच आज या मंदिरात …
Read More »दादरच्या हनुमान मंदिराला नोटीस उद्धव ठाकरे यांचा सवाल, हे कुठलं हिदूत्व? मंदिराबाबत रेल्वेने काढलेल्या नोटीशीवरून भाजपावर टीकास्त्र
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी करत रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हनुमान मंदिराला ८० वर्षे झाली असून तरीही हे ८० वर्षे जुनं असलेलं मंदिर पाडायला निघाल्यावरून उद्धव ठाकरे यांनी कामगारांनी बांधलेलं ८० वर्षे जुनं मंदिर हे आता …
Read More »नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावा याचिका अस्पष्ट आणि सदोष असल्याचा नाराय़ण राणेंचा अर्जातून दावा; लवकरच सुनावणीची शक्यता
शिवसेना उबाठा नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपा नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. परंतु, ती याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी मागणी कऱणारा अर्ज नारायण राणे यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. आपल्याविरोधात केलेली निवडणूक याचिका सदोष असून त्यात …
Read More »खिचडी घोटाळ्याप्रकऱणी सूरज चव्हाण यांच्या अटकेचे ईडीकडून समर्थन खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण
कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, राजकीय हितसंबंधांचा वापर करून त्यांनी खिचडी वापटाचे कंत्राट मिळवले होते, त्यामुळे चव्हाण यांची अटक कायदेशीर असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी उच्च न्यायालयात केला. उच्च न्यायालयात सूरज चव्हाण …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही… भाजपा आणि मनसेवर टीका
विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १०० हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले. इतकेच नव्हे तर माहिममधून त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही पहिल्यांदाच उमेदवारी दिली. परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्यातच भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तरी विजयाचा उत्सव साजरा केला जात …
Read More »२ च दिवसात देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे वक्तव्य आठवेना, आदित्य ठाकरे राहिले बघत आदित्य ठाकरे उभे राहिले, पण देवेंद्र फडणवीस यांनी केले पूर्ण दुर्लक्ष
राज्यात नव्याने स्थानपन्न झालेल्या महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर संध्याकाळी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तसेच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राची राजकिय संस्कृती वेगळी असून राज्यातील राजकिय परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी भूमिका घ्यावी …
Read More »अबु आझमी आणि रईस शेख यांनी घेतली शपथः मविआतून बाहेर? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कारण पुढे करत दिले संकेत
राज्यातील महायुती सरकारला मिळालेल्या संशयातीत विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर मतदान चोर अशी टीका करत सत्ताधाऱ्यांबरोबर आमदारकीची शपथ घेण्याऐवजी उद्या रविवारी शपथ घेणार घेणार असल्याची घोषणा केली. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे समाजवादी …
Read More »
Marathi e-Batmya