Tag Archives: भाजपा

पंतप्रधानांच्या त्या वक्तव्यावर प्रियंका गांधी टीका करत म्हणाल्या, रडणारे नेते… अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली टीका

दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली जात नाही. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सोनिया गांधी यांनी poor lady असे वक्तव्य केल्यावरून भाजपाने काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर त्यास काँग्रेसनेही प्रत्तितुर देत भाजपाला मागे रेटण्याचा प्रयत्न केला. आज …

Read More »

आशिष शेलार यांचा राहुल गांधीवर पलटवार, आत्मपराभवाचे प्रदर्शन… संसदेतील राहुल गांधी यांच्या दाव्यावर केली टीका

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत एकदम ७८ लाख मतदार वाढल्याचे सांगत हे मतदार कोठून आले याचे गौडबंगाल असल्याचा दावा केला. त्यावरून भाजपाचे मंत्री तथा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करत …

Read More »

अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींचा नवा दावा, भाजपाच फक्त मध्यमवर्गीयांची काळजी करते विधानसभा निवडणूकीच्या भाजपा प्रचाराच्या शेवटच्या सभेत केली घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने आयोजित निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावली. त्यावेळी आर के पुरम येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असल्याच्या घोषणेची आठवण दिल्लीकरांना करून देत …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांची खोचक टीका,… सहनशक्ती वाढविणारा… कृषी क्षेत्राला वाऱ्यावर सोडले, डॉलर विरूद्ध रूपयाबाबत काहीच नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र सीतारामण यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्यांचे तुष्टीकरण करणारा व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी अर्थसंकल्पावर केली. दिल्लीत संसदेत अर्थसंकल्प सादर …

Read More »

अर्थसंकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिक केंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. …

Read More »

नाना पटोले यांची टीका, केंद्रीय अर्थसंकल्प…वरवर आकर्षक वाटणारे बजेट केवळ गोलमाल महागाई व बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ठोस पावलांचा अभाव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत चमकदार अंदाजात सादर करुनही अर्थसंकल्प समाधानकारक झाला नाही, या बजेटने गुंतवणूकदार प्रभावित झाले नाहीत. तसेच शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकाचीही निराशाच केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि शेतमालाच्या हमीभावाबदद्लही काहीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया …

Read More »

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, अर्थसंकल्प म्हणजे…. बिल्ली चली हज को मध्यवर्ग आणि इतर घोषणांवरून खर्गे यांची अर्थमंत्री सीतारामण आणि पंतप्रधान मोदींवर टीका

केंद्रातील भाजपा प्रणित नव्या एनडीए सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केला. यावेळी १२ लाखाचे उत्पन्न कमाविणाऱ्या नव्या मध्यमवर्गाला दिलासा देत १२ लाख रूपये कमविणाऱ्या नोकरदारांचे उत्पन्न करमुक्त असल्याचे जाहिर केले. यावरून आणि एकदंरच अर्थसंकल्पातील विविध तरतूदींवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अर्थमंत्री सीतारामण आणि पंतप्रधान मोदी …

Read More »

अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केल्या या घोषणाः या वस्तू होणार स्वस्त लिथियम बॅटरीवर सवलत, मोबाईल, एलईडी-एलडी टीव्ही, चमड्याच्या वस्तूंचा समावेश

देशात तिसऱ्यांदा स्थानापन्न झालेल्या भाजपाप्रणित एनडीए सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामण यांनी लोकांच्या जीवनावश्यक बनलेल्या आणि रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील करात कपात केली. तसेच या वस्तूंच्या देशांतर्गत आणि परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील करात कपातही केली आहे. त्यामुळे साहजिकच …

Read More »

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह ठाकूरविरोधातील जामीनपात्र वॉरंट रद्द न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाचा निर्णय

मालेगाव २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि माजी भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध बजावलेले जामीनपात्र वॉरंट गुरुवारी विशेष न्यायालयाने रद्द केले. प्रज्ञा सिंह ठाकूर स्वतः उपस्थित राहिल्यानंतर न्यायालयाकडून वॉरंट रद्द करण्यात आले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आली असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयासमोर या खटल्यावर …

Read More »

ईडी नोटीसीवर पहिल्यांदा भाष्य करत राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा ईव्हीएम मशिन्सवर व्यक्त केली शंका

काही महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस आली होती. मात्र आता पर्यंत त्या नोटीसीबाबत राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकवेळा बोलण्याचे टाळले होते. मात्र आज पहिल्यांदाच मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पहिल्यांच बोलताना म्हणाले की, मलाही ईडीची नोटीस आली. त्यानंतर मी त्याच्या त्यांच्यासमोर गेलो. बरं ती नोटीस कशाबद्दल …

Read More »