राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे दोन्ही राष्ट्रवादींपैकी सर्वाधिक भंबेरी ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उडताना दिसत आहे. त्यातच अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक सीनियर पवारांचे सहकारी आणि जे अजित पवार यांच्यासोबत गेले, ते सर्वजण आता पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याचे संकेत देत आहेत. …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर योजना… महाराष्ट्राच्या दौऱ्यात पहिल्यांदाज महाविकास आघाडीच्या भीतीचा उल्लेख
महाराष्ट्रातील डबल इंजिनच्या सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने कामे केली आहेत. तसेच लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून विविध विकासकामे करण्यात येत असून आज त्याच विकास कामाचा भाग म्हणून मुंबईच्या मेट्रो-३ चे उद्घाटन करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीवाल्यांना जनतेला देण्यात येत असलेल्या योजना पसंत नाहीत. त्यामुळे ते योजना बंद करण्यासाठी …
Read More »भाजपाच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीत या आमदार-मंत्र्याचा समावेश केंद्र, राज्य सरकारच्या कामांच्या बळावर महायुती विजयी होणार-रावसाहेब दानवे
विधानसभा निवडणूकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली असून केंद्र आणि राज्य सरकारची अव्वल कामगीरी, पक्ष संघटनेच्या प्रभावी व्यवस्थापनाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीने केला आहे, अशी माहिती निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी दिली. …
Read More »पीएम किसान सन्मान निधी आणि नमो महासन्मान हप्ता एकाच दिवशी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण-कृषी मंत्री धनंजय मुंडे
लोकसभा निवडणूकीप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी आणि अप्रत्यक्ष केंद्र सरकारने दिलेल्या योजनेचा फायदा देत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील अनुक्रमे १८ वा व पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, आचारसंहिता, ..नाहीतर गणितं बिघडवणार मराठा समाजाला डावलू नका नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल
राज्यातील मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबाबत विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचे आवाहन मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना केले. जर राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर तुमची सगळी गणितं बिघडवणार असल्याचा इशाराही आज मनोज जरांगे पाटील …
Read More »नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा इशारा, दसऱ्याला सौ सोनार की एक लोहार… विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मशालचे नवे गाणं रिलीज
नवरात्री सणाच्या निमित्ताने आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती नवे थीम साँग आज जारी केले. हे थीम साँग राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. दादर येथील शिवसेना भवनात आयोजित कार्यक्रमात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत होते. …
Read More »नाना पटोले यांची मागणी, …फडणवीसांनी अपमान केला; जाहीर माफी मागा लाडकी बहीण फक्त मतांसाठीच; ६४ हजार बेपत्ता भगिनी संदर्भात सरकारने खुलासा करावा
लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून बोलत आहेत. व्होट जिहाद म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी समतेच्या मुल्याचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान, ठाकरेंनी विधानसभा लढून आमदार होऊन दाखवावे उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून!
देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, आमदार होऊन नंतर आरोप करावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून झाला आहे, असे ते म्हणाले. चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. चंद्रशेखर …
Read More »राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत घेण्यात आलेले हे दुसरे २५ निर्णय निवडणूक मौसम आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेला खुष करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील १५ निर्णयानंतर आणखी २५ निर्णय घेण्यात आले. यातील अनेक निर्णय महाराष्ट्रातील जनतेबरोबरच मोदी मित्र अदानीला दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या फायद्यासाठी घेण्यात आलेले आहेत. तसेच इतर महत्वाचे प्रकल्प जे बिल्डर लॉबी जी राज्य सरकार आणि केंद्रातील मंत्र्यांच्या …
Read More »शरद पवार यांचा अंदाज, या तारखेला मतदान पार पडलेले असेल…. अकलूजमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला अंदाज
नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता आणि निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांसह भाजपा आणि महायुतीतील पक्ष वगळता इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांकडून आशा होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी लेव्हल प्लेईंग …
Read More »
Marathi e-Batmya