राष्ट्रवादीचे काँग्रेस (अप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदर सुनील तटकरे यांनी ठाकरे शिवसेनेवर बाळा माने प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना कोकणात दोन अंकी संख्या गाठण्यात अपयशी ठरली आहे. त्या ठिकाणी आता उद्धव सेनेचे काहीच प्राबल्य नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांनी अगोदर त्याचे आत्मपरीक्षण करावे आणि मग पैसे वाटल्याचा आरोप करावा असा …
Read More »एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आमच्यात मतभेद नाही, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, महाविकास आघाडी विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार, दोन दिवसात निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाजपा सरकार हादरले, दिल्लीतून महाराष्ट्रात रिकाम्या हाताने येऊ नका
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे मोदी- फडणवीस सरकारच जबाबदार कांद्याच्या हमीभावासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये मविआचा शेतकरी क्रांती महामोर्चा, प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव द्या
कांद्याला सध्या प्रति क्विंटल २००-३०० रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा महाराष्ट्र …
Read More »शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका, घरी बोलावून मंत्री केलं ही चूक बच्चू कडू शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने केली टीका
गत महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना घरी बोलावत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. तसेच बच्चू कडू यांचा योग्य तो सन्मान राखला असे असतानाही शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्री पदाची पर्वा न करता एकनाथ शिंदे यांची साथ …
Read More »अहिल्यानगर- चंद्रपूरला जिल्हाधिकारी कार्यालय ५० कोटीच्या आत मात्र नागपूरात १०० कोटीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार पहिल्या अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हाचे राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्या नगरमध्ये नवे जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहिल्यानगर मात्र पूर्वीचे अहमदनगर येथे इमारतीची उभारणीही केली. त्यासाठी राज्य सरकारकडून ५० कोटी रूपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचधर्तीवर राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने उभारायचे …
Read More »अखेर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब अर्ज भरण्यास अवघा एक तासाचा अवधी शिल्लक राहिल्यानंतर अंबादान दानवे यांनी भरला उमेदवारी अर्ज
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत होती. मात्र महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. तसेच त्यांनी स्वतः ऐवजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे काँग्रेसकडून याबाबत …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट जैन मुनीचे विधान जैन धर्माच्या अहिंसा तत्वाला छेद देणारे, खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर तत्काळ कठोर कारवाई करा,
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन धर्माचे तत्व आहे, त्यालाच ते छेद देणारे आहे. गांधी हत्येत सात आरोपी होते. त्यातील एक माफीचा साक्षिदार झाला, काहींना शिक्षा झाली. कपूर आयोगाचा अहवाल आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. …
Read More »अनिल परब यांची मागणी, राज्य सरकारने जाहीर झालेल्या एसआयटी बाबत श्वेतपत्रिका काढावी गेल्या पाच अधिवेशनांमध्ये विरोधी व सत्ताधारी सदस्यांच्या मागण्यांनंतर अनेक SIT स्थापन; एकही अहवाल सादर केला नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषद सदस्य ॲड अनिल परब यांनी बुधवारी महाराष्ट्र सरकारने गेल्या पाच अधिवेशनांमध्ये स्थापन केलेल्या विशेष तपास पथकांच्या एसआयटी (SIT) स्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि त्यावर सविस्तर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी केली. विधान परिषदेत अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲड अनिल परब यांनी मागील …
Read More »अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला डिवचलं, आता कुठे गेले तुमचे वाघ? मंत्री मार खातायत, साताऱ्यातील घटनेवरून खिल्ली उडविली
सातारा जिल्हा परिषद निवडणूकीतील रणनीतीवरून नैसर्गिक युतीतील भाजपा आणि शिवसेना ओएफसी वाद रंगल्याचे चित्र दिसायला लागले आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत व्हीप बजावण्यासाठी गेलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळातील सहकारी पक्षातील मंत्रीच या सत्तेसाठी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र पाह्यला मिळाले. दरम्यान याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »
Marathi e-Batmya