मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली असून ही बाब धक्कादायक असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करत महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचीच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी …
Read More »प्रियंका गांधी-वड्राजी एका महिन्याच्या आत घर खाली करा केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार एसपीजी आणि झेड प्लस सुरक्षा असली तरी त्यांना सरकारी निवासस्थानात राहण्याची तरतूद नाही. त्यामुळे त्यांनी एका महिन्याच्या आत घर खाली करावे अशी नोटीस केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना बजाविली आहे. प्रियंका गांधी या सध्या काँग्रेसच्या नेत्या असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची …
Read More »६ वेळा मरून जिवंत झालेल्या दाऊदबाबत केंद्राने काय ते एकदाचं सांगावे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवून देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस …
Read More »तीन टप्प्यातील या सवलतींसह ३० जून पर्यत ५ वा लॉकडाऊन केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग लागू करण्यात आलेल्या ४ थ्या लॉकडाऊनची मुदत उद्या संपत असून त्यास आता थेट एक महिन्याचा ५ वा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने आज संध्याकाळी एका अध्यादेशान्वये जारी केला. मात्र या ५ व्या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. सवलती ८ जून पासून …
Read More »लॉकडाऊनबाबत केंद्राने दिले राज्य सरकारला हे अधिकार आवश्यकता असेल तर नियम कडक करा अथवा सूट द्या
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशातील लॉकडाऊनची मुदत ३१ मे पर्यत वाढविण्यात आली आहे. तसेच या कालावधीत अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियमावलीही जाहीर कऱण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून सदर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी किंवा त्यात सूट देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असून यासंदर्भातील आदेश आज जारी करण्यात आले. कोरोना विषाणूला …
Read More »४ थ्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने या गोष्टींना नाकारली परवानगी सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारनेही ४ थ्या लॉकडाऊनची घोषणा संध्याकाळी करत या काळात नेमके चालू राहणार काय बंद राहणार याबाबत स्पष्टता ठेवण्याचा प्रयत्न केला. ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची सुरुवात उद्या १८ मे पासून ते ३१ मे २०२० पर्यत वाढविण्यात आला आहे. संध्याकाळी जाहीर केलेल्या पत्रकानुसार बंद राहणाऱ्या गोष्टी …
Read More »आता दोन आठवड्यांचा लॉकडाऊन : परतणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी
मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी देशभरातील २ रा लॉकडाऊनचा टप्पा संपायला अवघे दोन दिवस शिल्लक राहीलेले असताना ४ ते १७ मे दरम्यानच्या तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तसेच स्थलांतरीत कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या इच्छित स्थळी अर्थात मुळ गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याची घोषणाही रेल्वे मंत्रालयाने गृह …
Read More »या नोडल अधिकाऱ्यांचे पत्र असेल तरच मूळ गावी जाता येणार मंत्रालयातील नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार: काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील स्थलांतरीत कामगार, पर्यटक, यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या परराज्यातील मूळ गावी जाण्यासंदर्भात सातत्याने केंद्राकडे मागणी केल्यानंतर अखेर त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे आणि परवानगी दिली. त्यानुसार राज्य सरकारकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून जाहीर केले. त्याचबरोबर राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक यांनाही नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला यश : कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना गावी जाण्यास परवानगी मुंबईतील ६ लाखाहून अधिक कामगार घरी पोहोचणार
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात अडकलेल्या जवळपास १० लाख कामगारांना त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून पर्यटक, विद्यार्थी यांनाही आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून तसे आदेशही जारी करण्यात आले. विशेष म्हणजे परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव …
Read More »धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये सीआयडी कसून तपास करीत असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …
Read More »
Marathi e-Batmya