आम आदमी पार्टीने आपलेच नेते राघव चड्ढा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून, पक्षाच्या नेत्यांनी पंजाबच्या खासदारावर टीका करणारे व्हिडिओ शेअर केले आहेत. परवापर्यंत, एकेकाळचे अरविंद केजरीवाल यांचे लाडके असलेले चड्ढा, ‘खरे मुद्दे’ मांडत नसल्याचा आरोप करत ‘आप’ने त्यांना उपनेतेपदावरून काढून टाकण्यापूर्वी राज्यसभेत ‘सर्वसामान्य माणसाचे प्रश्न’ मांडत होते. राघव चड्ढा आता …
Read More »केशव उपाध्ये यांची माहिती, भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री सहभागी होणार
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ५ ते १२ एप्रिल याकाळात रोजी राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये बोलत होते. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन पालकमंत्री म्हणून घेतलेल्या बैठकीत दिली माहिती
नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्वंकष विचार करावा, असे निर्देश निर्देश सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. नवी मुंबई येथे …
Read More »शशिकांत शिंदे यांची हमी, ऑपरेशन तुतारी होणार नाही याची हमी सरकारला शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही
अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस नुकसानीची भरपाई सरकारकडून अजूनही मिळाली नाही,केंद्राकडून इतर राज्यांना मदत झाली आपल्य राज्याला मदत मिळाली नाही, राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही, हे आम्हाला सभागृहात दिलेल्या उत्तरातून समजले आहे, एकही मंत्री अवकाळी पाऊस जिथं झाला तिथं गेले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात प्रकरणाने महायुती सरकार पोखरले… इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी संघटन सृजन अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातून राष्ट्रीय पातळीवरील नेते जिल्ह्यात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, यासोबतच तालुका, मंडल स्तर तसेच ग्राम स्तरापर्यंतच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीस सरकारकडून महाराष्ट्रधर्म व संविधानांच्या मुल्यांची पायमल्ली गोलवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ लादण्याचा डाव
शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, …
Read More »“सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची माफी मागावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सुनावले
अकोल्यात गॅस सिलिंडरच्या रांगेत एका वृद्धाला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज #गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव …
Read More »पंतप्रधान मोदी यांची केरळ मध्ये डाव्या आघाडीवर टीका, भाजपाच विजयी होणार पालक्काड येथील जाहिर सभेत केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ मार्च, २०२६) केरळच्या पालक्काड येथे एका सभेत सांगितले, “केरळमधील बदल हा लोकांचा आशीर्वाद, भाजपा कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आणि त्यांचे बलिदान यांमुळे घडत आहे.” विरोधी पक्षांवर जोरदार टीका करताना मोदींनी आरोप केला, “दशकांपासून एलडीएफ आणि यूडीएफने ‘घोटाळ्यां’च्या दरम्यान सत्तेची अदलाबदल केली, तरीही लोकांसमोर पोकळ दावे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभूतपूर्व निर्णय
राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्वाकांक्षी पाऊल उचलले. सन २०११ पर्यंत झालेली व सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयानुसार, कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या …
Read More »मंत्री नरहरी झिरवाळ यांचा उद्या रात्रीपर्यंत राजीनामा ? व्हिडिओचे सत्य समोर आल्यानंतरच निर्णय घेणार: मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
राज्यातील महायुती सरकार मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे अडचणीत येत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे अडचणीत आलेला असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ …
Read More »
Marathi e-Batmya