Tag Archives: bjp

आमदार विलास तरे यांचा विधानसभेत सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा केला भांडाफोड मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशी व कारवाईचे आदेश

वसई विरार शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर विधानसभेत तारांकित प्रश्न क्र. २४५६९  उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा भांडा फोड केला असून त्यावर मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई चे आदेश दिले …

Read More »

ममता बॅनर्जी म्हणाल्या, दिल्लीचा लाडू जिंकू शकणार नाही भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बँनर्जी विरूद्ध सुवेंद्रू अधिकारी यांच्यात लढत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सामना कोलकाताच्या भवानीपूर मतदारसंघात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. त्यामुळे २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत एक रोमांचक लढत अपेक्षित आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी स्वतः या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना ही घोषणा केली. या निवडणुकीत ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, गॅस टंचाई नाही म्हणता… मग रांगा कशासाठी? गॅस पुरवठ्यावरून राज्य सरकारला केला सवाल

राज्यात एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही असा दावा सरकार करत असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या विरोधाभासावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गॅस टंचाई नाही म्हणता, तर मग लोक सिलिंडरसाठी रस्त्यावर रांगा का लावत आहेत?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला …

Read More »

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हर्षवर्धन सपकाळ, सचिन सावंत यांची प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करुन पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय …

Read More »

राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, कांशीराम यांना भारतरत्न प्रदान करा उत्तर प्रदेशातील कांशीराम यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केली मागणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, बहुजन समाज पक्षाची (BSP) स्थापना करणारे आणि दलितांचे प्रेरणास्थान असलेले कांशीराम यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले: “मी अशी मागणी करतो की, भारत सरकारने सामाजिक न्यायाचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा स्पष्टोक्ती, काँग्रेस मुक्ता कदम आणि डॉ दीपक पवार यांच्या पाठिशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट

भाजपा आणि रा.स्व.संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व …

Read More »

तामीळनाडूत भाजपाकडून आंध्र प्रदेशची पुनरावृत्ती ? अभिनेता विजयच्या पक्षाला युतीची ऑफर तामीळनाडूच्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर

भाजपाने दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूकीत तेलगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर युती केली. तसेच एन चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाबरोबर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली. या आघाडीक तेलगू देसम पक्षाबरोबर पवन कल्याण यांच्या पक्षालाही चांगला फायदा झाला. भाजपाने त्या बदल्यात पवन कल्याण यांना …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सार्वजनिक सुनावणी घ्या संयुक्त संसदीय चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवावे

राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत सादर केलेले धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ दोन्ही सभागृह सदस्यांच्या समितीकडे पुनर्विचारार्थ पाठवण्यात यावे तसेच मुलभूत हक्कावर घाला घालणाऱ्या या विधेयकावर आक्षेप नोंदवण्यासाठी विधेयकावर जाहीर सुनावणी घ्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, आज …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, तेल-वायु कोणाकडून खरेदी करायची याची परवानगी अमेरिका का देतेय? पुरवणी मागण्यावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला सवाल

अनुदान पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना सरकारवर टीका केली आणि विचारले की, भारत कोणाकडून तेल आणि वायू खरेदी करायचा हे ठरवण्याची परवानगी अमेरिका का देत आहे? राहुल गांधी पुढे म्हणाले की,“… वेगवेगळ्या तेल पुरवठादारांशी असलेले आपले संबंध आपण ठरवू शकतो का, हेच बिघडले आहे. आणि …

Read More »

ओम बिर्ला यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, विरोधी पक्षनेता सभागृहाच्या वर नाही लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव जिंकल्यावर केली टीका

विरोधी पक्षाचा अविश्वास ठराव सभागृहात पराभूत झाल्यानंतर गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा काम सुरू करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपली कृती निःपक्षपाती असल्याचे सांगत आपल्या पहिल्याच भाषणात ओम बिर्ला म्हणाले की, प्रत्येक खासदाराला लोकसभेत बोलता यावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, तसेच विरोधी पक्षनेता “सदनाच्या वर” नसल्याचे स्पष्ट करत …

Read More »