Tag Archives: bjp

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून बंडखोरांचे मंत्रीपद जाहिर (फोटो बघाच) राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने बंडखोरांवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात दौरा करत बंडखोरांच्या विरोधात चांगलेच रान माजविले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सध्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील औरंगाबादच्या दौऱ्यावर गेले. मात्र औरंगाबादमध्ये असताना ते मध्येच दिल्लीला रवाना झाले …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून दिलगिरी व्यक्त न करता दिले ‘हे’ स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात पडसाद उमटल्यानंतर अखेर राजभवनाकडून भगतसिंग कोश्यारी यांचे एक निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात त्यांनी कालच्या वक्तव्याबाबतचे फक्त स्पष्टीकरण दिले. तसेच त्या वक्तव्याबाबत कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही. अंधेरी मुंबई येथे२९ जुलै २०२२ रोजी चौकाच्या नामकरणाच्या वेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी …

Read More »

ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याचे पाप भाजपाचेच काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांचा आरोप

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये इतर मागास वर्गीयांना (ओबीसी) राजकीय आरक्षणास मुकावे लागणार आहे. कोर्टात योग्य बाजू मांडण्यात शिंदे-फडणवीस सरकार कमी पडल्याने या निवडणुका ओबीसी आरक्षणशिवायच होणार आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यास भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला. भारतीय जनता पक्ष …

Read More »

भाजपा आमदारच म्हणाले, तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांचा तो निर्णय रद्द करा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढवलेली सदस्य संख्या रद्द करा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्या वाढीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेले तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला तो निर्णय रद्द करण्याची मागणी भाजपाच्या आमदाराने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली. यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.बावनकुळे …

Read More »

अजित पवार यांचा टोला, उटांवरून शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार… वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी लगावला टोला

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या पाहणीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून अजित पवार नुकसानीची पाहणी करत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे चिडलेल्या भाजपाच्या काही नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा निर्णय का दिला याचे आर्श्चय, पण पुनर्विचार याचिका दाखल करणार सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूकाच्या आदेशावर दिली प्रतिक्रिया

राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचे महाविकास आघाडी सरकारनंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे स्वप्न भंगले. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने सुरु केलेली प्रक्रिया आता पुन्हा नव्याने सुरु करणार की …

Read More »

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणीमध्ये उडाली शाब्दीक चकमक भाजपा खासदारांकडून सोनिया गांधी यांना घेराव

लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यावरून लोकसभेत भाजपाच्या सदस्यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले. याच कालावधीत सोनिया गांधी या भाजपाच्या ज्येष्ठ खासदार रमा देवी यांना भेटण्यासाठी भाजपा सदस्य बसतात त्या …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या पालापाचोळ्यावरून शेलार यांचा पलटवार म्हणाले, ट्रेलर दणक्यात… मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हे महाराष्ट्राला बदनाम

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर जवळपास महिन्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज सामना या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत आज प्रसारीत करण्यात आली. या मुलाखती दरम्यान उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकाही बंडखोराचे आमदाराचे नाव न घेता म्हणाले जे गळाले ते पालापाचोळा अशी खोचक टीका केली. …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांना टोला, हा जो पालापाचोळा आहे ते म्हणजे… ठाणेकर जनता सुज्ञ आहे ते निवडणूकीत दाखवून देतील

ठाणेकर हे सुज्ञ असून शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली त्या ठाण्यातच काय तर महाराष्ट्रभरातील लोक निवडणुकीचा वाटत पाहत असून निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोरांचा हा पालापाचोळा उडून जाईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी लगावला आहे. इतकचं नाही तर त्यांनी राजकीय पक्षांनी युती करताना करार करुन तो जनतेसमोर ठेवायला हवा असा कायदा बनवण्याची मागणीही …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा आरोप, त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचेत… ते दुसऱ्यांचे आदर्श पळवत स्वत:चे म्हणून दाखवायचेत

शिवसेनेचे पक्षप्रमुख असतानाही राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून अनपेक्षितरित्या उतरावे लागल्यानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी मुलाखतीद्वारे व्यक्त झाले. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या बंडाळीबरोबरच भाजपावरही त्यांनी टीका केली. शिवसेनेतील बंडखोर गट मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. बंडखोरांचं खरोखर काही कर्तृत्व असेल तर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे फोटो …

Read More »