मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. …
Read More »मोठी बातमी: पंजाबमध्ये मोर्चेकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखले १५ ते २० मिनिटे रस्त्यातच पंतप्रधानांना थांबावे लागले
मराठी ई-बातम्या टीम पंजाब विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोर्चेकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे अखेर दौरा रद्द करण्याची वेळ आली. परंतु भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या प्रकारास पंजाबच्या काँग्रेसला जबाबदार धरले असून मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी हे साधे फोन घ्यायला तयार नसल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर …
Read More »आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले अनिल देशमुखांचे आभार काटोल नगर परिषदेच्या विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजना उद्घाटनावेळी केले वक्तव्य
मराठी ई-बातम्या टीम मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे ईडीने सुरु केलेल्या कारवाईत सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे आभार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले असून त्यामागे कारणही खास आहे. काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास …
Read More »नवाब मलिकांचा नवा आरोप, जबाब बदलण्यासाठी पंचावर एनसीबी दबाव आणतेय पंचनामा मागील तारखा बदलण्याबाबत समीर वानखेडे आणि पंचामधील संभाषण मलिकांनी केले माध्यमांसमोर उघड
मराठी ई-बातम्या टीम मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करुन एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी त्यांच्या घराच्या मोकळ्या …
Read More »भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांनंतर आता भाजपा नेत्यांची पाळी?
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र यावेळी त्यांना ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाली आहे. त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असून मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी त्या होम क्वारंनटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनीच …
Read More »रावसाहेब दानवेंनी दिला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना “हा” सल्ला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी या नेत्यांकडे द्या
मराठी ई-बातम्या टीम मागील दोन-तीन महिन्यापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रियेमुळे प्रशासकिय कामकाजातून मुख्यमंत्री हे दूर राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता आपण पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचा संदेश विरोधकांसह राज्यातील जनतेला देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट ऑनलाईन बैठक घेत मुंबईकरांसाठी थेट कर सवलतच जाहीर केली. त्यानंतरही भाजपाचे नेते तथा …
Read More »नितेश राणेंना न्यायालयाचा दिलासा नाहीच, आता उच्च न्यायालयात धाव नितेश अद्यापही अज्ञातवासात
मराठी ई-बातम्या टीम संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देत सलग दोन दिवस सुणावनीनंतर आज अखेर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या मोबाईल जप्त करून अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. न्यायालयाच्या या निकालामुळे राणे कुटुंबियांना …
Read More »पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,… विश्वास कोण ठेवणार? राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत मोदींशी चर्चा झाल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनीच काल एका कार्यक्रमात दिल्यानंतर त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर खोचक टीका करत यांचा इतिहासच खोटे बोलण्याचा आहे. त्यामुळे यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असला …
Read More »शरद पवारांचा गौप्यस्फोट, सरकार स्थापनेसाठी मोदींसोबत चर्चा झालेली पण अजित पवारांना पाठविले नव्हते
मराठी ई-बातम्या टीम राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केला. इंडियन इक्सप्रेस ग्रुपच्या मराठी वर्तमानपत्र संस्थेकडून शरद पवार यांच्यावरील अष्टावधानी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर …
Read More »त्या दिवशी विधान परिषदेत काय घडले? उपसभापती कार्यालयाने दिला घटनाक्रम विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाने दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम बोलण्याची संधी नाकारल्याच्या कारणावरून विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला आहे. मात्र त्या दिवशी अर्थात काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधीच्या वेळी नेमके काय झाले याची माहिती उप सभापती कार्यालयाने जाहिर केली आहे. ती माहिती खालील प्रमाणे …
Read More »
Marathi e-Batmya