वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी – सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मरिन लाईन्स ते वांद्रे सी लिंक अंतर १० मिनिटात धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याचे उद्घाटन
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक, जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणाप्रसंगी सांगितले. या प्रकल्पामुळे मरिन ड्राईव्ह ते …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ कुटुंबांना भेटून संवाद साधणार शिवसेना जनतेच्या घरी, आठवडाभरात १ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प
शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अभियानाची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या अभियानात …
Read More »मुंबई महापालिकेला पार्किग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान माहिती अधिकार मधून माहिती आली बाहेर
मुंबई महापालिकेने एलेव्हेटेड मल्टीलेव्हल इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंग सिस्टीम (शटल आणि रोबो पार्कर सिस्टीम) मुंबादेवी येथे सुरु केली तर माटुंगा, फोर्ट आणि वरळी येथे कार्यादेश दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई पालिकेला पार्किग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान झाले असल्याची तक्रार करत चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली …
Read More »नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य तातडीने पाऊले उचलण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावित, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मृद व जलसंधारण …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुतीने केंद्राच्या पाया पडावं
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि …
Read More »काँग्रेसची मागणी, राज्यात १८सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करा नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे मागणी
१७ सप्टेंबर रोजी राज्यातील गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी राज्य सरकारकडून शासकिय सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. तर १६ सप्टेंबर रोजी महमंद पैगंबर यांचा जन्म दिवस आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजीची महमंद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जाहिर करण्यात आलेली सुट्टी १८ सप्टेंबर रोजी जाहिर करावी अशी मागणी माजी मंत्री व …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार… वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य
वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या अभिष्टचिंतन, पुरस्कार प्रदान आणि वारकरी …
Read More »आरजी कार हॉस्पीटल अत्याचार प्रकरणी तृणमूलचे जवाहर सरकार यांचा राजीनामा काही निर्णय पटत नसल्याने राजीनामा
तृणमूल काँग्रेस (टीएमसी) राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी रविवारी कोलकाता रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी बंगाल सरकारने प्रकरण बेजाबदार पद्धतीने हाताळल्याच्या निषेधार्थ आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात, जवाहर सरकार यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील “मोजके आणि भ्रष्ट लोकांची अनियंत्रित दबंग …
Read More »मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाटः पाच जण ठार पोलिसांचेही काही चालेना
मणिपूरमध्ये हिंसाचाराची नवीन लाट उसळली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले आणि हत्येचे सत्र सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी काही संशयित कुकी बंडखोरांनी राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नुंगचप्पी गावावर हल्ला केल्यानंतर झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती …
Read More »
Marathi e-Batmya