Tag Archives: chief minister

विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांचे वारकरी दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान वारकऱ्यांच्या मागणीनुसार दौंडचा प्रस्तावित कत्तलखाना रद्द, वारकऱ्यांना अपघात गटविमा, वाहनांना टोल माफी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीतील भाजपा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक ते दिड टक्का मतदान कमी झाल्याची माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूकीला अद्याप तीन ते चार महिन्यांचा अवकाश असला तरी कमी झालेल्या मतांची टक्केवारी …

Read More »

वर्सोवा खाडीजवळील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट जेसीबी ऑपरेटर राकेश यादव यांच्या कुटूंबियांना ५० लाखांची मदत तर कुटूंबातील एका सदस्याला मिळणार नोकरी

ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची महिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड …

Read More »

ओरिसाचे मुख्यमंत्री म्हणून मोहन माझी यांनी घेतली शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा

मोहन माझी यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील पहिल्या भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा आज (१२ जून) भुवनेश्वर येथे पार पडला. भुवनेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात चार वेळा आमदार आणि आदिवासी नेते मोहन चरण माझी यांनी ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

एनडीए नेत्यांच्या उपस्थित टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि बंदी संजय, भारताचे माजी सरन्यायाधीश …

Read More »

किसान सभेचा आरोप, राज्याचा कृषी विभाग अद्यापही निष्क्रिय खरीप हंगाम तयारीबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

राज्यात मान्सून सक्रिय झाला असताना राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नाही. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असते. राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या खरीप नियोजन बैठकांमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी, पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी पहिल्यांदाच केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित

तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,… टँकर भरण्यासाठी सोलर पंप वापरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे …

Read More »

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन …

Read More »

शरद पवार यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा, …अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्र लिहित दिला इशारा

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र राज्य सरकार अजून अंग झटकून कामाला लागल्याचे दिसून येत नाही. या दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पहात राहणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …

Read More »

पाण्यासाठी दिल्ली सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, हरियाणा, उत्तर प्रदेशला आदेश द्या सध्या दिल्लीतील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा

मागील काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरणात उष्म्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यातच दिल्लीला पाण्याचा भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच दिल्लीला पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. यापार्श्वभूमीवर शेजारील राज्य असलेल्या हरियाणाने दिल्लीला महिनाभरासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी दिल्लीतील आप सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली …

Read More »