औरंगाबादः जगदीश कस्तुरे कोल्हापूर, सांगली आणि कराड परिसरात आलेला महापूर हा कृष्णा खोरे विकास महामंडळाने आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे या भागात महापूर आल्याने या गलथान कारभाराच्या विरोधात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची घोषणा औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र दाते -पाटील यांनी केली. राज्यातील …
Read More »कोल्हापूर, सांगली, कराडमधील १ लाख हेक्टर जमिनीच्या नुकसानीचा अंदाज अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविल्याची मुख्य सचिवांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत २ लाख ५२ हजार ८१३ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या पुरामुळे १ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली. …
Read More »पूरग्रस्तांची थट्टा थांबवा, सरसकट सर्वांना मदत द्या पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा भागाला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आणि थोरात यांची भेट
कराड: प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पूरग्रस्तांना तातडीने सर्व प्रकारची मदत करण्यात सरकार अपयशी ठरले असताना दुसरीकडे या पूरग्रस्तांची सरकारने क्रूर थट्टा केली आहे. दोन दिवस पाण्यात बुडालेल्यांनाच सरकारी मदत देण्याचा शासन आदेश काढून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. …
Read More »सांगली, कोल्हापूर मंत्र्यांसाठी जलपर्यटन क्षेत्र घोषीत करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा टोला
मुंबई: प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली आणि साता-यातील जनतेचे आयुष्य भीषण पूरपरिस्थितीमुळे उद्धवस्त झाले असताना दोन दिवस पूरात बुडल्याशिवाय मदत मिळणार नाही, असा आदेश काढणा-या असंवेदनशील व बेफिकीर सरकारला जनतेचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका करत पश्चिम महाराष्ट्राला पुराने वेढले असताना जलसंपदा मंत्री महाजन हे सेल्फीचा आनंद काढत फिरत आहेत. …
Read More »मुख्यमंत्री महोदय…महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या केवळ १० किलो धान्याचा आदेश हि पुरग्रस्तांची थट्टा असल्याचा नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
मुंबई : प्रतिनिधी माझ्या वक्तव्यांना तुम्ही गांभीर्याने घेत नसाल तरीही त्याचे स्वागत करतो. मात्र तुमच्यापुढे सनदशीर मार्गाने मांडलेली राज्याची वास्तविक पुरपरिस्थिती तरी गांभीर्याने घ्या, ते ही जमत नसेल तर पुरात वाहून जाणाऱ्या जिवांना तरी तुमच्या गांभीर्याने घेण्याचा निकष लागु होतो का ?ते सांगा. किमान ज्या राज्याने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसविले त्या …
Read More »कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने …
Read More »१० वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेकडून २० गुण मिळणार यंदाच्या वर्षापासून गुण देण्यात येणार असल्याची शिक्षण मंत्री शेलार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांच्या प्रगती करीता पुन्हा एकदा शालेय अंतर्गत २० गुण देण्याची पध्दत पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्याच्या १०० मार्काची पध्दत बंद करून पुन्हा एकदा ८० लेखी परिक्षेला तर २० हे गृहपाठ, तोंडी परिक्षा, खेळ आदी अंतर्गत पध्दतीला करण्याचे निश्चित …
Read More »राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राने तात्काळ ४ हजार कोटीं द्यावे पूरग्रस्त भागात मदत व बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे व केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला चार हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात …
Read More »पूरपरिस्थितीमुळे महाजनादेश यात्रेच्या अखेरच्या दिवसाचे कार्यक्रम रद्द मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दाखल
मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे उद्या शुक्रवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मा. देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त सांगली – कोल्हापूरकडे धाव घेतली असून त्यांनी स्वतः मदतकार्यात पुढाकार घेतला असल्याने महाजनादेश यात्रेचे शुक्रवारचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे यात्रा …
Read More »डोक्यावरून पाणी गेल्यावर मुख्यमंत्र्यांना लक्षात आले राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांचा उपरोधिक टोला
शिर्डी: प्रतिनिधी राज्यात संकट आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महाजनादेश यात्रा थांबवायला पाहिजे होती. मात्र त्यांची यात्रा सुरुच असून आम्ही आक्षेप घेतल्यावर त्यांनी एक दिवस बंद ठेवली. जर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेळीच सुचना द्यायला हव्या होत्या. मात्र डोक्यावरुन पाणी वाहायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आल्याचा उपरोधिक टोला अजितदादा पवार यांनी …
Read More »
Marathi e-Batmya