Tag Archives: cm fadnavis

आरोग्य विभाग म्हणते आम्ही कर्मचारी भरणार पण १६०० अधिपारिचारीकांना नाही अधिपरिचारिकाचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

मुंबईः प्रतिनिधी एकीकडे राज्य सरकारने सरकारी नोकर मेगा भरतीचे आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला दिले आहे. तर दुसऱ्यापासूला बंधपत्रित अधिपारिकांना नोकरीत कायम न करण्याचे धोरण आरोग्य विभागाने स्विकारले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या फसवणूकीच्या धोरणाच्या विरोधात आणि बंधपत्रित अधिपरिचरिकांना कायम सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडून आझाद मैदानावर …

Read More »

विधवा-वृद्धांच्या अनुदानात भरीव वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात ६०० रुपयांवरून १००० रुपये वाढ करण्यासह एक अपत्य असणाऱ्या विधवांना ११०० रुपये तर दोन अपत्य असणाऱ्या विधवांना १२०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिवर्षी १६४८ कोटींच्या खर्चासही …

Read More »

सरकार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज नव्याने घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ३१३ बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रूपयांची गरज आहे. हे कर्ज घेण्यासाठी आझ झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत राज्यातील ३१३ बांधकामाधीन प्रकल्पांवर आहेत. या प्रकल्पांवर ८३ हजार ३०० कोटी रूपयांचा खर्च झालेला आहे. उर्वरित कामासाठी ९३ हजार ५७० कोटी रूपयांची गरज …

Read More »

राज्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत पूरामुळे १६ नागरिकांचा बळी गेला आहे. लाखो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय …

Read More »

राज्यातील पुरस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना उशिरा जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपरोधिक टीका

मुंबईः प्रतिनिधी सततच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात गंभीर परिस्थिती असून कोणीही राज्यकर्ता असो या संकटग्रस्त लोकांना बाहेर काढण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजनैतिक कामात गुंतलेले होते. पण उशिरा का होईना ते त्यावर आता काम करतायत हे चांगलं असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली. काही निवडक …

Read More »

यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात. पण यात्रेच्या नादात राजधर्म विसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. आणखी कोणत्याही शेतकऱ्यावर धर्मा पाटील होण्याची दुर्दैवी वेळ आणू नका असा उपरोधिक सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात येण्याच्या आदल्याच दिवशी जिल्ह्यातील सहा …

Read More »

पुरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, आरोग्य सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क रहावे पूर परिस्थिती आणि मदतकार्य आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात ज्या भागात पूर ओसरला असेल तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला …

Read More »

पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांना १० लाखाची मदत द्या तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मराठवाडा व विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. या महापुरामुळे शेतमालासह खाजगी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी तसेच पूरग्रस्त …

Read More »

पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल

पुणे – राजगुरुनगर – खेडः प्रतिनिधी आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला केला. शिवस्वराज्य यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर – खेड येथे पार पडली. …

Read More »

नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथके तैनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

यवतमाळः प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, नाशिक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून या उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथकांना तैनात करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. जे जे आवश्यक आहे ते सर्व तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश आपण प्रशासनाला दिल्याचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »