मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांवर राज्यात गणेशोत्सव आलेला आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा संभावित धोका लक्षात घेवून राज्य सरकारने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने नियमावली जाहीर केली. ती खालीलप्रमाणे… १) महापालिकेच्या धोरणानुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक. २) उच्च न्यायालयाच्या निर्णयामप्रमाणे आणि …
Read More »सामाजिक न्यायच्या निधीतून सारथीला ८ कोटी : काँग्रेसने मात्र संधी गमावली वित्त मंत्री अजित पवारांनी काँग्रेसला केले बीन महत्वाचे
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जातींसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या खर्च न झालेल्या निधीतील आठ कोटी रूपयांची रक्कम सारथीच्या स्थैर्यासाठी देण्यात आली. विषेश म्हणजे यासंबधीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी घेतला आणि लगेच त्याची प्रतीपूर्ती केली. राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाचे खाते नसल्याने काँग्रेसने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत मदत …
Read More »प्रियंका गांधी-वड्राजी एका महिन्याच्या आत घर खाली करा केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार एसपीजी आणि झेड प्लस सुरक्षा असली तरी त्यांना सरकारी निवासस्थानात राहण्याची तरतूद नाही. त्यामुळे त्यांनी एका महिन्याच्या आत घर खाली करावे अशी नोटीस केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना बजाविली आहे. प्रियंका गांधी या सध्या काँग्रेसच्या नेत्या असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची …
Read More »काँग्रेसनेही विचारले आता पंतप्रधान मोदींना ७ प्रश्न चीनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला दिला कोट्यवधींचा निधी : बाळासाहेब थोरात
मुंबई : प्रतिनिधी चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करुन गलवान खोरे, पेंगॉग तलाव परिसर, हॉटस्प्रिंग व वाय जंक्शन भागात लष्कराची जमवाजमव केली. चीनी सैन्याच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चीन सीमेवर तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »चीनप्रश्नी, पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधात काँग्रेसचे आंदोलन मोदी सरकारविरोधात आंदोलनाचे रणशिंग!: बाळासाहेब थोरात
मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात …
Read More »नवा सल्लागार: मुख्यमंत्र्यांचा स्वत:च्याच पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांवर अविश्वास शिवसेनेच्या अनुभवी मंत्री, आमदारांमध्ये नाराजी
मुंबई : प्रतिनिधी मागील ४०-४५ वर्षे शिवसेनेसाठी काम करत आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी समर्थपणे आणि यशस्वीतेने पार पाडली. आता सत्तेत आल्यानंतर पक्षात काल परवापर्यंत आलेल्या नवख्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यातच आता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रशासनातील व्यक्तीवर सल्लागाराची जबाबदारी सोपविल्याने पक्षप्रमुखांचाच पक्षा नेते-कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? असा सवाल शिवसेनेतील …
Read More »ठाणे, औरंगाबाद, लातूरसह या जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हा व शहर अध्यक्ष जाहीर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नऊ जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्त्यांची आज घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या अनुमतीने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नव्या नियुक्त्यांमध्ये लातूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीशैल मल्लीकार्जून उटगे तर लातूर शहरच्या अध्यक्षपदी ऍड किरण …
Read More »मोदीजी, महागाईने सामान्य जनतेचे चिपाड झाले, अजून किती पिळणार? पेट्रोल-डिझेलचा समावेश GST अंतर्गत करा; सध्याची दरवाढ त्वरीत मागे घेण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई: प्रतिनिधी सहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वारंवार कमी होत असतानाही त्याचा लाभ मोदी सरकारने सामान्य जनतेला दिलेला नाही. उलट सलग तेरा दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवल्या जात असून जनतेची लूट थांबवण्याचा मोदी सरकारचा मानस दिसत नाही. आधीच कोरोनाचे संकट व त्यात महागाईने पिचलेल्या पिळून पिळून रस काढलेल्या उसाप्रमाणे …
Read More »बैठक तर झाली पण आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती तोडगा लवकरच निघेल अशी काँग्रेस नेत्यांना आशा
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचे खाती नाही. तसेच निर्णय प्रक्रियेत स्थान नसल्याच्या मागणीवरून काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत असलेली नाराजी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनीही नेत्यांचे म्हणणे ऐकत यासंबधीचा निर्णय नंतर कळविणार असल्याचे …
Read More »चीनने घुसखोरी करुन भारताचा भूभाग बळकावला की नाही याची माहिती द्या चीनला लाल डोळे करुन दाखवण्याची हिच योग्य वेळ : सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी चीनने सीमेवर घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत असून सत्य परिस्थिती काय आहे ? हे मोदी सरकारने जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. चीनने खरेच सीमेवर आगळीक केली असेल तर मोदींनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चीनला लाल डोळे वटारून दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रदेश काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya