Tag Archives: congress

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्यामुळे दलित मतं पुन्हा काँग्रेसकडे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा चित्रपट पाहिला आणि एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला भेट दिली

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी बिहारच्या दरभंगा येथे ‘शिक्षा न्याय संवाद’ मोहिमेची सुरुवात केली आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी समुदायापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात अनुसूचित जाती आणि जमाती (एससी आणि एसटी) च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंबेडकर वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नंतर, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही, महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा

ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले खरीप हंगामासाठी सरकारची तयारी नाही, खते, बि बियाण्यांचा पुरवठा मुबलक ठेवा, बोगस बियाणे, लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करा

राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. …

Read More »

मध्य प्रदेशमधील भाजपा मंत्र्याची कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात मुक्ताफळे काँग्रेसने केली भाजपा मंत्र्याची राजीनाम्याची मागणी

मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री कुंवर विजय शाह पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहेत. यावेळी भाजपा नेत्याने भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल उग्र जातीयवादी टिप्पणी केली, ज्यांनी भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरद्वारे माध्यमांना माहिती दिली होती. १३ मे रोजी कुंवर विजय शाह …

Read More »

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी पाच वर्षासाठी प्रदेशाध्यक्ष पदी केली नियुक्ती

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि …

Read More »

शस्त्रसंधी, अमेरिकाः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांची मागणी अधिवेशन बोलवा काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसचा तीव्र आक्षेप

काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेसने आज तीव्र आक्षेप घेतला. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित सर्व पक्षियांची बैठक बोलवावी आणि त्यास स्वतः उपस्थित रहावे व संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावी अशी मागणी केली. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि …

Read More »

जयराम रमेश यांची मागणी, युद्धबंदीची माहिती पंतप्रधानांनी सर्वपक्षिय बैठकीत सामायिक करावी काँग्रेस, डाव्या पक्षांची मागणी केंद्र सरकारकडे मागणी

शनिवारी (११ मे २०२५) रोजी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जाहीर झालेल्या युद्धबंदीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्वपक्षियांबरोबर सामायिक करावी असे आवाहन करत पुढील वाटचालींच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही यावेळी विरोधकांनी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, वॉशिंग्टन डी.सी. कडून झालेल्या “अभूतपूर्व घोषणा” लक्षात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच काँग्रेस पक्ष संपण्याची भाषा करणाऱ्यांना देशाचा जाज्वल्य इतिहास माहित नाही

काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून दिले असा पक्ष संपत नसतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही,…तर काँग्रेस भाजपा विरोधात लढत राहिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला …

Read More »