Tag Archives: devendra fadnavis

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प (Cyber Security Project) जनतेमधील सायबर हल्ल्याची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रकल्प जनतेचे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यात, त्यांना दिलासा देण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहत …

Read More »

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे सी – २९५ या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे …

Read More »

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण; कल्याणकारी उपक्रमांना चालना सणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना १,७८,१७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा …

Read More »

भाग-२ मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय शासकिय दुःखवटा असूनही निवडणूकीसाठी निर्णयांचा सपाटा

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ निर्णयाचा सपाटाचा लावला असून भविष्काळात राज्य सरकारमध्ये वापसी होते का नाही या विंवचनेत असलेल्या महायुतीच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या या सुरु असलेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा घेण्यात आली. तसेच विद्यमान राज्य सरकारच्या हिंतसंबधाशी संबधित अनेक निर्णय घेतले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, जाता जाता महाभ्रष्ट युती सरकारची महाउधळपट्टी सरकारच्या डिजिटल जाहिरातीसाठी ९० कोटी तर SMS साठी २४ कोटींचे टेंडर

भारतीय जनता पक्ष, शिंदे सरकारचे शेवटचे दिवस राहिल्याने घाईघाईने जेवढे लुटता येईल तेवढे लुटण्याचे काम सुरु आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कोट्यवधी रुपयांची टेंडर मंजूर करून मलिदा लाटण्याची लगीनघाई सुरु आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीसाठी राज्य सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढले असून पाच दिवसांत हे ९० कोटी रूपये खर्च करायचे आहेत. मंत्रिमंडळाचे …

Read More »

राष्ट्रीय दुःखवटा जाहीर असतानाही राज्य सरकारने घेतली मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

काल रात्री उशीरा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर देशातील त्यांच्या उद्योगाचा विस्तार आणि त्यांच्या प्रती जनसामान्यांसह उद्योग विश्वात असलेल्या आदराप्रती केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक दिवसाचा दुःखवटा जाहिर केला. हा दुःखवटा जाहिर केल्यानंतर सर्व शासकिय कार्यक्रम रद्द करण्यात येतात आणि पुढे ढकलण्यात …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारचे ९० कोटी रुपयांचे टेंडर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण…. मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री

मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुण्याच्या बोपदेव भागात विद्यार्थीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला, त्याचे आरोपी अद्याप सापडले नाहीत तोच मुंबईत घटना घडली. दररोज कुठे ना कुठे महिलेवर अत्याचार केल्याच्या …

Read More »

सुप्रिया सुळे यांची टीका, तर फडणवीस यांना भाऊ म्हणून मी हार घातला असता… फडणवीसांनी राज्याला भारताची गुन्हेगारी राजधानी केली

पुणे येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे यावर भर दिला आणि महाराष्ट्रातील महिला आणि बालकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात फडणवीस यांनी असमर्थ ठरले. तसेच महाराष्टातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले असून राज्याला भारताची गुन्हेगारी राजधारी म्हणून घोषित केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष… समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्- उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील २ कोटी २० लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत …

Read More »