मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता द्सतुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्री व्यक्त करत आहेत. तसेच या अनुषंगाने वैद्यकिय सुविधा आणि यंत्रणेचा आढावाही घेण्यात आला. यापूर्वीच राज्यात दर आठवड्याला वीकएण्ड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना आता सलग १५ दिवसांचा लॉकडाऊन …
Read More »हे करा… ते करा बोलणं योग्य नाही, गुजरात मॉडेलचे बघा भाजप नेत्यांवर नवाब मलिक यांचे टिकास्र
मुंबई: प्रतिनिधी देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावत गुजरातमधील गुजरात मॉडेलचे काय होत आहे त्याकडेही लक्ष द्या …
Read More »शरद पवार ब्रीच कँण्डीत दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोट दुखीवर उपचार घेतल्यानंतर आज त्यांना आज रविवारी पुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. त्यांच्यावर उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या अगोदर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांची विश्रांती करण्याचा सल्ला दिला …
Read More »परिक्षार्थींच्या मागणीनुसार रविवारची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांची विनंती आणि एमपीएससीची परिक्षा रद्द
मुंबई : प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परिक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आता परिक्षार्थींनीच परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे …
Read More »जयंत पाटील फडणवीसांना म्हणाले, महाराष्ट्राचे नेते अन् महाराष्ट्राबरोबरच भांडताय ... अहो केंद्राबरोबर भांडू नका किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा
मुंबई: प्रतिनिधी राज्याला लस जास्त कशी मिळेल असा प्रयत्न करा… तुम्ही महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडताय… अहो केंद्राबरोबर भांडू नका किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. लस उपलब्ध नाही म्हणून लसीकरण वेगवेगळ्या ठिकाणी …
Read More »लसीकरणप्रश्नी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांची भूमिका वेगळी पवार म्हणतात ते मदत करतायत तर मंत्री टोपे आणि प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणतात ते देतच नाही
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील लसीकरणाची अनेक केंद्र कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्याची पाळी आल्याची भूमिका राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडत महाराष्ट्राला मागणी पेक्षा कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्यात येत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवरच थेट हल्ला चढविला …
Read More »गुजरातला एक कोटी तर महाराष्ट्राला अवघे ७ लाख ५० हजार लसीचे डोस आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली केंद्राची पोलखोल
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आले. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ …
Read More »राज ठाकरे म्हणाले, देशमुख यांचा मुद्दा महत्वाचा नाही तर स्फोटकांच्या गाडीचा मुख्य विषयावरून दुर्लक्ष करण्यासाठी हा मुद्दा
मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा असून अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नसल्याचे वक्तव्य करत मुळ विषयावरून भरकटवू नका असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. सद्यपरिस्थितील लॉकडाऊन लागू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव …
Read More »नवे गृहमंत्री वळसे-पाटील तर मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्र्याकडे खाती वाढली अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे
मुंबई : प्रतिनिधी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने गृहमंत्री पदाचा जबाबदारी आता कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडील खाती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले. …
Read More »गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा उच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वत:हून घेतला निर्णय
मुंबई: प्रतिनिधी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने गृहमंत्री पदी राहणे उचित होत नाही. त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. तसेच त्यानंतर ते नवी दिल्लीला गेले. राज्यात माजी पोलिस आयुक्त …
Read More »
Marathi e-Batmya