मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात सर्वाधिक १००८ रूग्णांचे निदान झाले असून गेल्या ५१ दिवसात एकादिवसात इतक्या रूग्णांचे निदान होण्याची ही पहिलीच वेळ असून १०६ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली पोहोचली असून ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू …
Read More »राज्यातील सर्वांवर मोफत उपचार : खाजगी रूग्णालयांच्या मनमानीस लगाम महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट
मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर करत राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही …
Read More »देशातील १० दिवसांपूर्वीच्या रूग्ण आकड्याशी राज्याची बरोबरी ५८३ नवे रूग्णांच्या निदानासह १० हजार ४९८ वर पोहोचली
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मागील २४ तासात राज्यात ५८३ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण संख्या १० हजार ४९८ वर पोहोचली. तर आज पुन्हा २७ जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत १७७३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे …
Read More »पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचे केले कौतुक चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप
मुंबई: प्रतिनिधी राज्यावर आलेले कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विशेषत: अजित पवार हे चांगले चांगले काम करत आहेत. तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहकारीही चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मारत त्यांचे कौतुक केले. समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी या …
Read More »एकही रुग्ण तपासणी- उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे …
Read More »९ हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार करत राज्यात ३१ जणांचा मृत्यू मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या …
Read More »सोलापूरची संख्या ३ ने वाढत ६८ वर मात्र ते सारीचे रूग्ण एकाचा मृत्यू
सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूरातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज ५८ जणाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या ६ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी …
Read More »आज पुन्हा थोडीशी संख्या वाढली राज्यात ८ हजार ५९० वर पोहोचले रूग्ण तर मुंबईत ५ हजार ७७६
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काल रविवारच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली असून मागील २४ तासात ५२२ रूग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील रूग्णांची संख्या आज ५ हजार ७७६ वर पोहोचली असून तब्बल २७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत १२८२ रूग्ण बरे होवून घरे गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री …
Read More »अन्यथा रूग्णालयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही संख्या ६० वर नेणार: पीपीई कीट, मास्क राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली …
Read More »पालकमंत्री मलिक म्हणाले, परभणीकरांनो कोरोनामुक्त झाल्याबद्दल अभिनंदन पुढेही कोरोनामुक्तच राहिल असा विश्वास
परभणी: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानतानाच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे. सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल …
Read More »
Marathi e-Batmya