मुंबईः विशेष प्रतिनिधी काही वर्षापूर्वी झालेल्या भीमा कोरेगांव येथील हिंसाचाराची आणि पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेचा एकमेकांशी संबध आहे. जेव्हा हिंसाचाराची घटना घडली तेव्हा शरद पवारांनी या हिंसाचाराचा संबध हिंदूत्ववाद्यांशी जोडला. मात्र आता शहरी नक्षलवाद्याचे काही पुरावे समोर आल्याचे दिसल्यानेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविला असल्याचे …
Read More »महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर भाजपाची तिसरी जागा धोक्यात आणण्यासाठी आघाडीकडून दोन जण उतरणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यसभेवरील राज्यातील सात खासदारांची मुदत संपत आहे. या ७ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तर ५ वा उमेदवार महाविकास आघाडीकडून संयुक्तरित्या उभा करण्यात येणार आहे. मात्र भाजपाकडून आतापर्यंत फक्त दोनच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …
Read More »पंतप्रधानाच्या जीवाला धोका होता तर तपासात काय मिळालं? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपावर टीका
मुंबईः प्रतिनिधी पुण्यातील एल्गार परिषद झाली. त्यानंतर कोरेगांव भीमा येथे दंगल उसळली. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. मात्र त्यावेळच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र मिळालं. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च असतात आणि त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणणे हास्यास्पद असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …
Read More »पवार म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करा आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिल्याची राष्ट्रीय प्रवक्ते मलिक यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनाम्यात जे मुद्दे होते. त्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या मंत्र्याकडे कामे होती. त्यावर उपाययोजना करण्यात यावी आणि त्यातील आश्वासने पूर्ण करावी अशी स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्याना केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »मोफत वीज द्यायचीय, पण ४० हजार कोटी कसे जमा करायचे? ऊर्जा विभागासमोर मोठा प्रश्न
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत केली. मात्र या मोफत वीजेपोटी वीज महावितरण पर्यायी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणाऱ्या ४० हजार कोटी रूपयांच्या आर्थिक बोज्याचे वसुली कशी करायची असा प्रश्न ऊर्जा विभागाला पडल्याची माहिती वीज महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. …
Read More »भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीची परस्परविरोधी भूमिका एनआयएला तपास देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा
मुंबईः विशेष प्रतिनिधी पुणे येथील भीमा-कोरेगांव येथील हिंसाचार प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याचा निर्णय केंद्राने घेतला. केंद्राच्या या निर्णयास राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणाचा तपास एनआयएला सुपूर्द करण्याची भूमिका घेतल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत …
Read More »रखडलेल्या “गृहनिर्माण” प्रकल्पातून बिल्डरांचा होणार “महाविकास” अर्थसहाय्याबरोबरच, प्रिमियम सुट, एफएसआय वाढीव देणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्ट्यांचे पुर्नविकास प्रकल्प, म्हाडा वसाहतीतील पुर्नविकास प्रकल्पांची कामे मार्गी एकाबाजूला राज्य सरकारने पुढाकार घेतला असला तरी या पुढाकाराच्या नावाखाली चक्क मर्जीतील बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठी राज्य सरकारमधील एका वजनदार मंत्र्याने भलताच पुढाकार घेतल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. गेल्या अनेक वर्षापासून एसआरएचे जवळपास …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे धनंजय मुंडेंना आदेश अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि करिअर प्रशिक्षण आयोजित करा
मुंबईः प्रतिनिधी सामाजिक न्याय खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धी आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस …
Read More »आघाडीच्या काळातील “ठेकेदार” महाविकास सरकार येताच सक्रिय अनेक जूने अधिकारी, मंत्र्यांच्या गाठीभेटीवर भर
मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील ५ वर्षात राज्यातील गतीमान आणि पारदर्शक सरकारने जून्या ठेकेदारांचे साम्राज्य उध्वस्त करत नव्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन्न होताच पूर्वीच्या दशकात सक्रिय झालेल्या आघाडी सरकारच्या काळातील अनेक कोट्याधीश ठेकेदार सक्रिय झाले असून हितसंबधात असलेल्या मंत्री आणि …
Read More »आव्हान म्हणून काम केले तर स्मारकाचे काम दोन वर्षांत पुर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आशा
मुंबईः प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाचे काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर हे काम दोन वर्षांत पुर्ण व्हायला अशक्य नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिलच्या जागेची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. स्मारकाच्या जागेवर आतापर्यंत २५ टक्के काम झालं आहे. अजून ७५ टक्के काम …
Read More »
Marathi e-Batmya