Tag Archives: uddhav thackeray

बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले, तर त्या १६ जणांची आमदारकी धोक्यात उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तानाट्याला सुरुवात

२४ तासापूर्वी शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या १६  आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही लढाई लढली गेली. मात्र ती अद्याप अनिर्णित स्थितीत आहे. तर दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्या समर्थक असलेल्या आमदारांची संख्याही १६ आहे. आता या १६ …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावर १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया गोवा विमानतळावर बोलताना प्रतिक्रिया दिली

सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड क्षमविण्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अपयश आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी अखेर काल रात्री ९.३० वाजता आपण राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर तब्बल १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वास्तविक पाहता पक्षप्रमुख ठाकरे …

Read More »

तीन तासाहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद, मात्र मविआला धक्का राज्यपालांच्या आदेशानुसार बहुमत सिध्द करावे लागणार

बहुमत सिध्द करण्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिध्द करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाच्या विरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुर्यकांत आणि जे.पी. पर्डीवाला यांनी याप्रकरणी तब्बल तीन तासाहून अधिक काळ सर्व याचिकाकर्त्यांची मते ऐकून घेतली. त्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारने उपस्थित …

Read More »

मराठा आरक्षण नोकर भरतीसह ‘हे’ महत्वाचे मंत्रिमंडळ बैठकीत घेतले निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासह अन्य महत्वाचे निर्णय

नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणार निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळाल्याने बाधित झालेल्या झालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० मध्ये …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे मोठे निर्णयः औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर आणि… तर विमानतळाला पाटील यांचे नाव, सरकारी वसाहतीत शासकिय कर्मचाऱ्यांना भूखंड

२०१४ साली राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारपासून रखडलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न आज अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सोडवित अखेर करून दाखविले. आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असे करण्यात आले. त्याचबरोबर बहुचर्चित नवी …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, माझ्या विरोधात मतदान करणाऱ्यांना बघायचाय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरील बैठकीत केली भूमिका स्पष्ट

राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरु केलेल्या कारवाईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तसेच त्यासंदर्भातील सुनावणी अद्याप प्रलंबित असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अचानक महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर शिवसेना, …

Read More »

एकनाथ शिंदे बंड; २ रा अंक संपण्याच्या आधीच ३ रा सुरु फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यपाल कोश्यारी यांचे बहुमत सिध्द करण्याचे आदेश

राज्यातील महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधातच मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला. या बंडात सहभागी झालेल्या १६ आमदारांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजाविल्यानंतर त्याविरोधात शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने एकप्रकारे स्थगिती मिळविली. मात्र या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच राज्यपाल भगतसिंग …

Read More »

चंद्रकांत खैरेचा खोचक टीका, तो खर्च टरबुजाने केला की कुणी केला? राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने ७,००० कोटी रुपये खर्च केले

गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना ७,००० कोटी रुपये देण्यात आले असा आरोप शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी करत तसेच हा खर्च टरबुजाने केला की कुणी केला? असा सवाल उपस्थित शिवसैनिकांना केला. यावर शिवसैनिकांनी टरबुजाने केला असं उत्तर दिले. यावर खैरेंनी टरबुजाने खर्च केला असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवाजी महाराज यांचे नाव घेता मग… आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील

जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली. आपल्या …

Read More »

अचानक झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली ‘या’ विषयावर चर्चा पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या, मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले असून एक गट एकनाथ शिंदे यांचा तर दुसरा गट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा झाला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आता शिवसेनेतील अंतर्गत लढाई न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. …

Read More »