बदलापूरप्रकरणी सरकारवर टीका करत शरद पवार यांनी दिली शपथ भरपावसात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केले आंदोलन

बदलापूर प्रकरणी राज्य सरकारच्या विरोधात आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमख नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. आंदोलनावेळी शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्ये-पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी यांना शपथ दिली. तसेच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कारभारावरून टीकाही केली. विशेष म्हणजे पुण्यात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. तरीही या पावसात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बदलापूर येथे एक अस्वस्थ करणारी घटना घ़डली. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलो. बदलापूरात जो अत्याचार झाला, त्यामुळे संबध देशभरात महाराष्ट्राच्या नावलौकिकेला धक्का बसला आहे. महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारवर आहे, पण त्याची जाणीव राज्य सरकारला राहिली नाही. त्यामुळे बदलापूरप्रकरणी निषेध होत असताना आणखीही अशाच दुर्दैवी घटना घडल्या. महाराष्ट्रात एक दिवसही असा जात नाही की, भगिनींवर अत्याचार झाल्याची बातमी वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींच आहे. त्यांनी आपल्या राजवटीत त्या आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आजच्या स्थितीत जे घडलं त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे, परंतु राज्यकर्त्ये, राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी म्हणतातयत की, बदलापूर प्रकरणात विरोधक राजकारणात आणत आहे. मुलीबाळींवरींल अत्याचाराबाबत कोणी आवाज काढला तर हा निष्कर्ष काढत असतील तर राज्यकर्त्ये किती असंवेदनशील आहेत, भगिनींकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती चमत्कारीक आहेत, याची प्रचिती येते अशी खोचक टीका केली.

यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली,

मी शपथ घेतो की, स्त्रिंयांवर होणारा अत्याचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझा परिसर, माझे गावं, माझे कार्यालय अशा कोणत्याही ठिकाणी जर महिलांची छेडछाड, किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दल आवाज उठविन, मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही, महिलांचा सन्मान राखीन, आणि या पुण्यनगरीत, महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित व भयमुक्त स्थिती बनविण्यासाठी प्रयत्न अशी शपथही यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *