Editor

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? ट्रिपल इंजिन सरकार विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष

विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर तोल कशाचा घेता असा …

Read More »

एप्रिल-ऑगस्टमध्ये भारतातून मोबाईलची निर्यात ४७ हजार कोटींवर ४ हजार कोटींचे मोबाईल केले निर्यात

चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत भारतातून मोबाईल फोनची निर्यात जवळपास दुप्पट होऊन ५.५ अब्ज डॉलर (सुमारे ४५,७०० कोटी रुपये) झाली आहे. मोबाईल उद्योग संघटना इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने ही माहिती दिली. ICEA ने सांगितले की, एप्रिल-ऑगस्ट २०२३ मध्ये भारतातून मोबाईल फोनची निर्यात सुमारे ३ अब्ज डॉलर (४,८५० कोटी …

Read More »

एअर इंडियाने तेल अवीवची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली हमासच्या हल्ल्यानंतर एअर इंडियाचा निर्णय

हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलमधील तेल अवीववर हल्ला केल्यानंतर एअर इंडियाने १४ ऑक्टोबरपर्यंत तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेचा विचार करून एअर इंडियाने तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तेथून १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या …

Read More »

इस्रायलवर हमासच्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ भारतातही सणासुदीच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला. सणासुदीच्या आधी सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. या किमती स्थिर न राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. इस्रायलवर हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी तेलाच्या किमती ५ …

Read More »

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक आयोगाकडून जाहिर १३ ऑक्टोंबरपासून प्रक्रियेला सुरुवात तर ३ डिसेंबरला मतमोजणी

देशातील विशेषतः उत्तर भारतातील चार आणि ईशान्येकडील एका राज्यातील विधानसभांचा कालावधी पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केले. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणूका होत असल्याने हाच कल पुढील लोकसभा निवडणूकीत कायम राखला जाईल अशी अटकळ बांधली जात …

Read More »

पार्टी सुरू असतानाच हमासचे सैनिक इस्त्रायलच्या भूमीवर, गोळाबारात अनेकजण जखमी तर इस्त्रायलने केला हमासच्या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावरील हल्ल्याचा व्हिडिओ

पॅलेस्टाईनच्या हमास या लष्कराने शनिवारी इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले केले. त्या हल्ल्यात आज रविवारीही सातत्य ठेवले. विशेष म्हणजे यावेळी रॉकेट हल्ले करत हमासचे सैन्य पॅराशूटच्या माध्यमातून इस्त्रायली भूमीवर उतरून इस्त्रायली नागरिकांवर गोळीबार करत आहेत. तर अनेक तरूणींचे अपहरण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे काही व्हिडिओ …

Read More »

काँग्रेसची मागणी, राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा मुख्यमंत्र्यांनाही लिहिले पत्र

राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? या प्रश्नांची खरी खरी उत्तरे महाराष्ट्राला हवी आहे. सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून …

Read More »

शरद पवारांविषयी आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

शरद पवारांबरोबर आमच्या पण भावना आहेत,मात्र आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळी आम्हालादेखील अश्रू अनावर झाले होते याची आठवण करून देतानाच सारखे – …

Read More »

जपानमध्ये इंडिया मेला: भारत-जपान मैत्री दृढ होईल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल, अशा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जपान येथील कोबे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, दिल्लीच्या दावणीला बांधून ठेवायला गुवाहाटीवरून आणले का? एक मंत्री हात झटकतात, तर दुसरे मंत्री दमबाजी करतात

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हटवून दिल्लीतील भाजपाच्या आर्शिवादाने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस-पवार महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या काराभारावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलेच खडसावत दिल्लीच्या दावणीला बांधून ठेवायला गुवाहाटीवरून आणले का? असा सवाल विचारत चांगलेच कोंडीत पकडले. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील विविध भरती परीक्षांमध्ये पेपरफुटी प्रकरण समोर येताना प्रश्न …

Read More »