मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना चंद्रकांत पाटलांचा विरोध बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका-पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती
पुणे: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाढीव बदल्यांना दिलेली परवानगी मागे घेऊन कायद्याचे उल्लंघन टाळावे तसेच राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती, तिसऱ्या लाटेचा धोका आणि पुराचे संकट ध्यानात घेऊन सरकारी अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळाव्यात, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी एका …
Read More »सुशांतसिंह प्रकरणाला वर्ष होऊनही सीबीआयचे सोयीस्कर मौन सुशांतसिंह प्रकरणातील चौकशी सद्यस्थिती सीबीआयने तात्काळ स्पष्ट करावी! सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले असून अद्याप सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाही. एम्स पॅनेलने सुशांतसिंहच्या हत्येला नकार देऊनही ३०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सीबीआय याप्रकरणी अजूनही मुद्दाम मौन बाळगून आहे, त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना? अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा केलेल्या सुशांतसिंह …
Read More »भाजपा आमदाराच्या प्रयत्नातून उभारलेल्या “त्या” इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन तीन महिने वापरातील वास्तुचे उद्घाटन करुन मुख्यमंत्र्यांची फसगत कशाला?- अॅड आशिष शेलार
मुंबई: प्रतिनिधी १ मे म्हणजे महाराष्ट्र दिना पासून गेले तीन महिने जी वास्तु वापरात आहे त्या वास्तुचे उद्घाटन आज करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फसगत व्हावी आणि कार्यक्रमाचे हसे व्हावे अशा प्रकारे दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेने का करुन दाखवले? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे. …
Read More »मुंख्यमंत्री म्हणाले, जबाबदारीचं भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार महापालिकेच्या एच पश्चिम वार्डच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य
मुंबई: प्रतिनिधी मुंबईकरांची दैंनदिन गरज असलेल्या मुंबई लोकल प्रवास सुरु करण्यावरून एकाबाजूला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. मात्र न्यायालयाने फटकारल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जबाबदारीचं भान ठेवून लोकलबाबचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करत लोकल सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे स्पष्ट केले. संकटाचा सामना करतानाच विकास कामे सुरु ठेवण्यात येत असल्याचे सांगत …
Read More »मुंबई लोकलप्रवासावरून उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले लोकमधून प्रवास केल्याने संसर्ग वाढतो याला लॉजिक काय? न्यायालयाचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी मुंबईककरांच्या दैनदिन जीवनाचा भाग बनलेल्या उपनगरीय रेल्वे सर्वसामान्य नागरीक आणि पत्रकारांसाठी सुरु करण्याच्या मागणीप्रश्नी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुणावनीवेळी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच फटकारले असून तुम्हाला बसमध्ये झालेली गर्दी चालते मग लोकलमधील का गर्दी का चालत नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तसेच लोकलने प्रवास …
Read More »कोरोनामुळे विद्यार्थ्यांची फि सरकारने भरावी, एकच फि राज्यभरात लागू करा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे आंदोलन
मुंबईः प्रतिनिधी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने २७ जुलै रोजी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले होते. सदर निवेदनात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असे नमुद केलेले असतांना देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील महत्वाच्या शिक्षण विषयक मागण्यांकडे …
Read More »विद्यार्थ्यांना दिलासाः पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा यंदा नाही उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांची घोषणा
पुणे : प्रतिनिधी राज्यातील विविध विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परिक्षा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर १० वी आणि १२ वी च्या परिक्षा घेता आले नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्यात आले. …
Read More »अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने केली पूरग्रस्तांची थट्टा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
चंद्रपूरः प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असून राज्य सरकारने या पद्धतीने पूरग्रस्तांची थट्टा करू नये, अशी जळजळीत टीका भाजपा ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील …
Read More »पॉझिटिव्हीटी दर वाढला मग लसीकरणही वाढवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. …
Read More »
Marathi e-Batmya