Editor

मुख्यमंत्र्याचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची निनावी धमकी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केली चिंता

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. सदरहू प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन …

Read More »

ठाकरे सरकार पावसाळी अधिवेशनात हे अध्यादेश आणि विधेयके मंजूर करणार ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मंजूरीसाठी विधिमंडळात ठेवणार

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे तिसरे अधिवेशनास उद्या सोमवारपासून सुरु होत असून या पावसाळी अधिवेशनात ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मांडण्यात येणार आहेत. यातील बहुतांष अध्यादेश हे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणूका कोरोनामुळे पुढे ढकलण्यासांदर्भात आहेत. तर विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रम, जीएसटी आदींसंदर्भातील काही अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. याशिवाय राज्यातील जनतेच्या अनुषंगाने …

Read More »

पाऊस चांगला झाल्याने यंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित खरीपाच्या धर्तीवर रब्बीसाठी कृषिमंत्र्यानी प्रथमच घेतली राज्यव्यापी बैठक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली. राज्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षीत असून ही बाब विचारात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश भुसे यांनी यावेळी दिले. पुणे येथे झालेल्या या बैठकीमध्ये कृषी विभागाचे सचिव …

Read More »

कोरोनाने घालवली सत्ताधारी आणि विरोधकांची एक संधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या संकेत आणि प्रथा पहिल्यांदाच मोडित

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात सांसदीय कार्यप्रणालीनुसार कामकाज चालत असल्याने पावसाळी, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काही गोष्टींचे आयोजन राज्य सरकारकडून करण्यात येते. त्या गोष्टींना हजेरी लावायचे कि नाही याचा निर्णय राजकिय विरोधकांनी घेण्याचे स्वातंत्र्यही आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच कोरोनामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ना कोणती राजकिय गरमागरमी ना कोणत्या प्रथा आणि संकेताचे पालन अशी …

Read More »

आता औरंगाबाद, जालना आणि सोलापूरात टेलिआयसीयु सेवा कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलीआयसीयु उपयुक्त- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी टेलीआयसीयु प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. जेणेकरून अतिदक्षात विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच उपचार व मार्गदर्शन मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये यासेवेचा शुभारंभ …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा इशारा, पुढील दोन महिने धोक्याचे महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक

मुंबई : प्रतिनिधी करोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.  धारावी, वरळी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही. गणपती उत्सवानंतर सणांची मालिका सुरु झाली आहे. हा काळ नववर्षापर्यंत …

Read More »

कोरोना: आजची बाधित रूग्णांची संख्या कालच्या पेक्षा जास्त, मृत्यूदरात घट २० हजार ४८९ नवे बाधित, १० हजार ८०१ बरे झाले ३१२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी आगामी काळात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचे संख्येत मिळत असून काल १९ हजार नव्या बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर तब्बल आज २० हजार बाधित नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित ८ लाख ८३ हजार ८६२ वर तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख २० हजार ६६१ …

Read More »

घरोघरी सर्वेक्षणावर भर द्या मात्र विदाऊट मास्कचा दिसला की दंड करा शरद पवार, केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क …

Read More »

विद्यार्थ्यांना दिलासा : सीईटी परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली असून ०८ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. ज्यांना अर्ज सादर करता आले नाही, त्यांच्यासाठी मोठी सोय होणार असून हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च …

Read More »

केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी, शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा सूचनेचा निर्णय काँग्रेस आणि शरद पवारांना घेण्याची विनंती

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून …

Read More »