Editor

या विभागातील पदोन्नतीची साखळी सुधारणार अधिनियम दुरूस्तीचे विधेयक सादर करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळीत समतोल आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम ५ पोट – कलम (2अ) मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिनियमातील दुरुस्तीबाबतचे विधेयक विधानमंडळास सादर करण्यात येईल. यापूर्वी सेवा प्रवेश नियम करत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या …

Read More »

शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांना वाढीव खर्चासह ६ महिन्याची मुदतवाढ ५० टक्के सुरक्षा रक्कम परत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोव्हिडची महामारी ही नैसर्गिक आपत्ती गृहीत धरून शासकीय कंत्राटदारांच्या अडचणींवर उपाय करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या उपाययोजनांमुळे कंत्राटदारांकडे रोकड सुलभता येवून विकास कामांची गती मंदावणार नाही. केंद्र शासनाच्या गृह विभागाने तसेच राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी करुन लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांची  गती …

Read More »

१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेसकडून अभिनंदन! कोरोना रूग्णसंख्येत जगात तिसरा क्रमांक पटकावून मोदीनी भारताची किर्ती वाढविल्याची प्रवक्ते सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी सहा वर्षापूर्वी सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. परंतु त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणून १५ लाख देऊ हे आश्वासन मात्र आता पूर्ण केले. केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला कोरोनाचे १५ लाख रूग्ण दिले …

Read More »

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका अर्थसंकल्पातील घोषणेची पूर्तता- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नविन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नविन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. मार्च मध्ये झालेल्या …

Read More »

राज्याचा निकाल ९५.३० टक्के तर मुलींच्या निकालात ३ टक्क्यांनी वाढ कोकणाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी

मुंबई: प्रतिनिझी यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली, म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

राष्ट्रीय अध्यक्षांचा स्वबळाचा नारा तर प्रदेशाध्यक्ष पाटलांचे सेनेबरोबर युतीचे वक्तव्य २४ तासातच भाजपाच्या युटर्नने राजकीय वर्तुळात खळबळ !

मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांना स्वबळाचा संदेश देवून २४ तास झाले नाहीत, तोच प्रदेश भाजपमध्ये  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सरकार बनविण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधून …

Read More »

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे तारीख पे ताऱीख ७ सप्टेंबरचा आता तिसऱ्यांदा मुहुर्त

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर दाटलेल्या कोरोनाच्या दाट छायेतून सुटका होताना दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजीत कार्यक्रमानुसार जून महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन बदलत्या परिस्थितीनुसार जुलैमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे या अधिवेशनाला जुलै नंतर ऑगस्टच्या मुहूर्ताची प्रतिक्षा होती ती देखील आता मावळली …

Read More »

कोरोना: पहिल्यांदाच १० हजार जण घरी तर २ ऱ्या दिवशीही रूग्ण संख्या कमी ७७१७ नवे बाधित रूग्ण , १० हजार ३३३ जण घरी तर २८२ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन महिन्यात पहिल्यांदाच राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर बरे होवून घरी जाण्याची पहिलीच वेळ झाली असून गेल्या २४ तासात १० हजार ३३३ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार २७७ वर पोहोचली आहे. तर ७७१७ नवे बाधित …

Read More »

यंदाच्या वर्षासाठी २५ टक्क्यानुसार कोणता अभ्यासक्रम वगळला? मग वाचा शालेय शिक्षण विभागाने दिली सविस्तर माहिती

मुंबई : प्रतिनिधी शालेय वर्ष २०२०-२१ साठी कोरोना (कोव्हिड 19)प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २५ टक्के शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या खालील अभ्यासक्रम-पाठ्यक्रम यंदाच्यावर्षीसाठी वगळण्यात आणि ठेवण्यात आला  याची माहिती. कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम स्वयं अध्ययनासाठी इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून  वगळलेले सर्व उपघटक हे स्वयं-अध्ययनासाठी …

Read More »

खुषखबर : लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे राहिलेले थकित वेतन मिळणार जुलै महिन्याचे वेतन अदा झाल्यानंतर मार्चचे अर्धे वेतन जमा होणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील निवडूण आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यातील अर्धे राहिलेले वेतन लवकरच मिळणार आहे. सध्या जुलै महिन्याचे वेतन तयार करण्याचे काम सुरु आहे. ते वेतन कोषागारातून दिले गेल्यानंतर लगेच मार्च महिन्याचे थकित अर्धेवेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश वित्त विभागाने सर्व विभागांना दिले असून याबाबतचा …

Read More »