Editor

मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही सर्वांना विश्वास घेऊन ही न्यायालयीन लढाई जिंकणारच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. …

Read More »

missionbeginagain हॉटेल्स, रीसॉर्टस्, होम-स्टेबाबत कार्यप्रणाली जारी पर्यटन विभागाकडून याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रीसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास …

Read More »

सरकारी कंपनी सांगते कोरोना चाचणी ७९६ रू.त करा मात्र राज्याने १२०० रू. दर लावला खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने राज्याच्या आरोग्य खात्याने केली सुमारे २७० कोटींची लूट

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात जनतेच्या पैशाची कोटयावधी रुपयांची लूट केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. खाजगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी आज केली. कोरोनाच्या काळामध्ये जनतेला …

Read More »

शिवसेनेचे डॅमेज रोखण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवारच कंगना प्रकरणाशी राज्य सरकारचा संबध नाहीच

नवी दिल्ली : प्रतिनिधी मुंबई आणि महाराष्ट्राला दूषण देणाऱ्या कंगना राणावत हिच्या ट्विटरवरील वक्तव्यांना जाब विचारण्याच्या नादात सुरू झालेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे डॅमेज व्हायला लागले. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आघाड़ीचे कर्तेकरविते शरद पवार यांनी पुढाकार घेत मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईशी …

Read More »

या मंत्र्यांचीही टेस्ट आली पॉझिटीव्ह राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची ट्विटरवरून माहिती

मुंबई-सांगली : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. या विषाणूची लागण कधी आणि कोणापासून होईल याची कोणतीही श्वाश्वती नाही. या विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत असताना कोरोनाने राज्यातील राजकारण्यांनाही विळखा घालायला सुरुवात केली असून आता राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनीच ट्विटरच्या माध्यमातून …

Read More »

मंत्रालयात ई-फाईल, ई-लीव्ह, एमआयएस प्रणाली सुरू होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ई-ऑफिस सुरु करण्यासंदर्भात आदेश

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय व्यवस्था गतिमान करतानाच जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ई-ऑफिस प्रणाली आणखी सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. त्यानुसार मंत्रालयातील नस्ती व्यवस्थापन ई-फाईल, रजा व्यवस्थापन ई-लीव्ह, ज्ञान व्यवस्थापन केएमएस, माहिती व्यवस्थापन एमआयएस या प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक मुख्यमंत्री …

Read More »

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी सारखीच संख्या; बरे ७ लाख तर बाधित १० लाखाच्या जवळ २३ हजार ४४६, १४ हजार २५३ बरे झाले तर ४४८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग २ ऱ्या दिवशी २३ हजाराहून अधिक अर्थात २३,४४६ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ९ लाख ९० हजार ७९५ वर पोहोचले असून ती लवकरच १० लाख रूग्ण संख्येचा टप्पा पार करणार असल्याचे दिसून येत आहे. तर बाधित रूग्णांची संख्या २ …

Read More »

कोरोना : आजही मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढच: अॅक्टीव्ह रूग्ण अडिच लाखापार २३ हजार ८१६ नवे बाधित, १३ हजार ९०६ बरे झाले तर ३२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत असून काल २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा २३ हजार ८१६ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५२ हजार ७३४ वर तर एकूण रूग्ण संख्या ९ लाख ६७ हजार ३४९ वर …

Read More »

लहान मोठ्या व्यावसायिक – उद्योजकांना एकत्र घेऊन येणारे हक्काचे फर्स्ट महा मार्ट.कॉम लोकल व्यवसायाचे ग्लोबल मार्केटिंगसाठी एकमेव डिजीटल प्लॅटफॉर्म

पुणे : प्रतिनिधी देशासह संपूर्ण महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, तर बरेच उद्योग, व्यवसाय अजुन ही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनाचा कहर आणि त्याचा लहान मोठे उद्योग, व्यवसायिकांवर होणारा परिणाम हा दुरगामी स्वरूपाचा असणार आहे. आरोग्याची काळजी असल्याने सामान्य नागरिक पूर्वी प्रमाणे विनाकारण …

Read More »

या आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये २६  जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती,  परंतु ८ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती …

Read More »