Editor

माजी केंद्रीय गृहसचिव आणि अनेक समित्यांचे प्रमुख राम प्रधान यांचे निधन ९२ व्या वर्षी वार्धक्यामुळे घेतला शेवटचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज सकाळी ८.३० वाजता वार्धक्यामुळे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. माजी केंद्रीय गृहसचिव होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतरच्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव …

Read More »

निसर्ग चक्रीवादळग्रस्त १२ महाविदयालयांना राष्ट्रवादी वेल्फेअरकडून १०० संगणक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केले सुपूर्द

मुंबई: प्रतिनिधी शरद पवारांचा पहिला आग्रह हा नुकसान झालेल्या भागातील पीडितांना मदत देण्याचा असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणातील १२ महाविद्यालयात १०० संगणक आज वाटप करण्यात आले असून हा टप्पा इथेच संपत नसून पुढील काळात देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर ट्रस्टतर्फे अशी मदत केली जाणार असल्याची ग्वाही …

Read More »

आयटीआयला प्रवेश घ्यायचाय, मग १ ऑगस्टपासून या वेबसाईटला द्या भेट कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तथापी, आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती …

Read More »

अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मुंबईबाहेर जावून घेतली कोरोनाची आढावा बैठक लोकप्रतिनिधींनी शासन-नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी

पुणे : प्रतिनिधी मागील काही काळापासून राजकिय विरोधकांकडून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घरात बसून कोरोना महामारीचा आढावा घेत असल्याची टीका सातत्याने करण्यात येत होती. तसेच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार हे राज्यातील चार जिल्ह्यांचा दौरा करतानाही त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारले गेले. त्यावेळी कप्तान मुंबईत …

Read More »

कोरोना: पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान ११ हजार १४७ नवे बाधित रूग्ण, ८८६० जण बरे झाले तर २६६ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान आज झाले असून ११ हजार १४७ रूग्णांचे निदान झाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे या महानगराबरोबरच सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूरातील रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची …

Read More »

५ ऑगस्टपासून Missionbeginagain अंतर्गत जून्यासह या नव्या सवलती मिळणार केंद्राच्या नियमावलीनंतर राज्यानेही जाहिर केली नियमावली

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.  काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्ट २०२० पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली …

Read More »

मेडिकलची अंतिम वर्षाची परीक्षा नाही तर इंटर्नशिप नाही: केंद्रीय परिषदेची भूमिका येत्या ३१ जुलैला न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडू- अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घेण्यात येतील. तसेच  विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशिप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र यास केंद्रीय परिषदेने नकार दिल्याने येत्या ३१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार …

Read More »

केंद्राचे शिक्षण धोरण म्हणजे देशाचा उलटा रोडमॅप शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी देशातील नवी पिढी घडविण्यासाठी तब्बल ३० वर्षानंतर केंद्र सरकारने नवे शिक्षण धोरण तयार करत आज त्यास मान्यता देण्यात आली. मात्र या धोरणामुळे देशाला मागे घेवून जाणारा उलटा रोडमॅप असल्याची टीका शिक्षक भारती प्रमुख तथा आमदार कपिल पाटील यांनी केली. 1) गरीब आणि बहुजनांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित ठेवणारं. 2) …

Read More »

कोरोना: राज्यात २० लाख १६ हजार चाचण्यानंतर रूग्णसंख्या पोहोचली ४ लाखावर ९२११ नवे बाधित रूग्ण, २९८ जणांचा मृत्यू तर ७४७८ जण झाले बरे

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यत २० लाख १६ हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आज राज्यात ९२११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असून महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४६ हजार १२९ इतक्यावर पोहोचली आहे. तर आज ७४७८ जण बरे होवून …

Read More »

अखेर राज्य सरकारला झाली एसटी कर्मचाऱ्यांची आठवण एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लवकरच बैठक घेणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन ते चार महिन्यापासून कोरोनाकाळातही आपली सेवा बजाविणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना अद्याप पगार मिळालेला नाही. तरीही हे कर्मचारी सतत काम करत आहेत. त्यामुळे अनेक एस.टी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत ओढावत आहे. यापार्श्वभूमीवर अखेर अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षखाली लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब …

Read More »