Editor

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना महिनाअखेर लाभ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. सहकार मंत्री म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली …

Read More »

एम.पी.एस.सी. परीक्षार्थींसाठी आता ऑनलाईन कोचिंग क्लास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. करोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन …

Read More »

महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी १० हजार कोटी द्या ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची केंद्राकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोविड-19 मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने तात्काळ दहा हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती एका पत्राद्वारे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांच्याकडे केली. राज्यात गेल्या ३ महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे महावितरणला फार मोठया व अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या काळात …

Read More »

कोरोना: जूनमध्ये ५ हजार ६९१ मृत्यू , बरे होणाऱ्यांची संख्या ९३ हजारावर ५५३७ नने रूग्ण तर १९८ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे अखेरला २२८६ मृतकांची नोंद झाली होती. मात्र १ जून रोजी २३६२ मृतकांची नोंद झाली. १ जून ते १ जुलै या कालावधीत राज्यात एकूण ५ हजार ६९१ मृतकांची नोंद झालेली असून आतापर्यंत ८ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात २२४३ जणांना घरी सोडण्यात आल्याने …

Read More »

प्रियंका गांधी-वड्राजी एका महिन्याच्या आत घर खाली करा केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार एसपीजी आणि झेड प्लस सुरक्षा असली तरी त्यांना सरकारी निवासस्थानात राहण्याची तरतूद नाही. त्यामुळे त्यांनी एका महिन्याच्या आत घर खाली करावे अशी नोटीस केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना बजाविली आहे. प्रियंका गांधी या सध्या काँग्रेसच्या नेत्या असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची …

Read More »

रुग्णवाहिकांकडून होणाऱ्या आर्थिक लूटीतून सामान्यांची होणार सुटका खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार: शासन निर्णय जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना …

Read More »

रोजगारविषयक मार्गदर्शन आणि ऑनलाईन कौन्सिलिंग आता प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारविषयक तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध रोजगारविषयक अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाईन कौन्सिलिंग सत्र आयोजित करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान प्रायोगिक तत्वावर २४ व २५ जून रोजी उस्मानाबाद व सातारा येथे ऑनलाईन कौन्सिलिंग सत्राचे आयोजन करण्यात …

Read More »

राज्यातली महिला बचत गटे झाली ग्लोबल ॲमेझॉन आणि जीईएम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्याची मंत्री मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले होते. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि जीईएम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री …

Read More »

अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ५ कोटी ग्रामीण जनतेस मोफत औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदांना – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई: प्रतिनिधी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे ५ कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त …

Read More »

कोरोना: दोन महिन्यानंतर मुंबईतील संख्या हजाराच्या आत मात्र उपनगरात वाढच ४८७८ नवे रूग्ण तर २४५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने १२०० ते २८००च्या दरम्यान वाढीव रहात असे. मात्र आज पहिल्यांदाच मुंबई महानगर पालिका हद्दीत ८९३ इतक्या कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. कालही शहरामध्ये १२४५ च्या जवळपास संख्या होती. परंतु उपनगरातील ठाणे जिल्हा ५५० हून अधिक, नवी मुंबई १९५, कल्याण डोंबिवली ४३५, …

Read More »