Editor

यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक पुन्हा गोल्डमॅन सॅक्समध्ये रूजू वरिष्ठ सल्लागार पदावर गोल्डमॅन सॅक्समध्ये दाखल

यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे गोल्डमन सॅक्समध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील झाले आहेत, अशी घोषणा गुंतवणूक बँकेने मंगळवारी केली. या नियुक्तीमुळे सुनक यांना पूर्ण वर्तुळ मिळाले आहे – त्यांनी २००० मध्ये उन्हाळी इंटर्न म्हणून फर्ममध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि २००१ ते २००४ पर्यंत विश्लेषक म्हणून काम केले. “त्यांच्या …

Read More »

दिल्ली सरकारचा निर्णय जून्या वाहनांना आता इंधन नाहीत १ नोव्हेंबरपासून जून्या वाहनांना इंधन मिळण्यावर बंदी

दिल्ली सरकारने १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या डिझेल कार आणि १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पेट्रोल कार रस्त्यावर चालवण्यास परवानगी देण्याच्या अलिकडेच घेतलेल्या निर्णयानंतर, १ नोव्हेंबरपासून या वाहनांना इंधन वापरण्यास परवानगी राहणार नाही, असा एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, त्याच तारखेला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) च्या पाच जिल्ह्यांमध्ये इंधन …

Read More »

देशातील कामगार संघटनांच्यावतीने ९ जुलै रोजी देशव्यापी संप कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात संप पुकारला

देशातील कामगार संघटनांनी सरकारच्या “कामगारविरोधी” धोरणांचा हवाला देत ९ जुलै रोजी देशव्यापी संप पुकारला असला आणि चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी केली असली तरी, वरिष्ठ सरकारी सूत्रांनी नोंदवले आहे की कामगार कायदे आता राज्ये लागू करत आहेत तर केंद्राने आतापर्यंत चारही कायद्यांपैकी एकही अधिसूचित केलेला नाही. “३१ राज्य सरकारांनी …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मनोगत, राज्यघटनेमुळे कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात गौरव

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सक्षम राज्यघटनेमुळे देशातील कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकते, ही राज्यघटनेची ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना भारताची राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीश …

Read More »

समीर वानखेडे प्रकरणी सीबीआयची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही समीर वानखेडेंविरुद्ध तपास ३ महिन्यांत पूर्ण करू

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, आर्यन खान लाचखोरी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंविरुद्धचा तपास येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल. या प्रकरणातील तपासाला झालेल्या विलंबावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत सीबीआयला खडसावल्यानंतर ही ग्वाही दिली. हे प्रकरण २०२१ …

Read More »

पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मीरा रोडमध्ये मनसे-शिवसेना उबाठाचा मोर्चा शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांना मोर्चेकऱ्यांनी हाकलून लावले

मीरा भाईंदर येथे पोलिसांनी सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना उबाठाच्य़ावतीने आज मीरा रोड येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भव्य मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. “मराठी माणूस गप्प बसणार नाही” हा संदेश देत हजारो मनसे आणि शिवसेना उबाठाचे कार्यकर्त्यांसह स्थानिक मराठी नागरिक रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्रावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज वाढीव पुरवण्या मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली

राज्यावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज झाले असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा गंभीर आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या पुरवण्या मागण्यांवर आज विधान परिषदेत बोलताना केला. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, त्या …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीतील त्या १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार विधानसभेत एसटी महामंडळाच्या भांडार खरेदीत घोटाळा प्रकरणी चर्चेत दिली माहिती

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने …

Read More »

विरोधी पक्षनेते पदावरुन विधानसभेत विरोधकांचा सभात्याग प्रश्नोत्तराच्या तास सुरु होण्याआधीच भास्कर जाधव यांच्याकडून बोलायला सुरुवात

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होऊन आज दुसरा दिवस सुरु झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तासाची घोषणा करताच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांसदीय लोकशाही राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरील …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाईत पक्षपातीपणा नको त्या त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रक म्हणून समितीत बोलावले जाईल - मंत्री उदय सामंत

बेकायदेशीर धार्मिक बांधकामांवर कारवाई करताना कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात निवडक पद्धतीने पावले उचलू नयेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारकडे केली. अनधिकृत धर्मस्थळांच्या कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधींना स्थान द्यावे, अशी मागणीही यावेळी केली. विधानसभेत भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी मुंबईतील …

Read More »