Editor

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर भारताची भूमिका स्पष्ट, परिणामांचा अभ्यास निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर फायदेशीर व्यापार करण्याच्या भूमिकेवर ठाम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन शुल्क आणि दंडांच्या घोषणेला भारताने प्रतिसाद दिला, असे म्हटले की ते “त्याच्या परिणामांचा अभ्यास करत आहेत” आणि “निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर फायदेशीर” व्यापार करारासाठी आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५% शुल्क आणि अनिर्दिष्ट दंडाची घोषणा केल्यानंतर काही तासांतच …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर भारतीय निर्यातदार स्तब्ध भारताची अमेरिकेला मागील वर्षी २० अब्ज डॉलर्सची निर्यात

१ ऑगस्ट रोजी परस्पर शुल्क आकारणीसाठी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची शक्यता खूपच कमी वाटत होती, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५% शुल्क आणि दंडाची घोषणा केल्याने उद्योगांना माहिती नाही, प्रस्तावित दंड आणि भारतीय निर्यातीची सापेक्ष स्पर्धात्मकता याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. येत्या काही महिन्यांत सरकार द्विपक्षीय …

Read More »

टाटा कंपनी विकत घेणार इटलीची इव्हेको ग्रुप ३.८ अब्ज युरोमधी करणार खरेदी

जागतिक व्यावसायिक वाहन उद्योगाला आकार देण्यासाठी सज्ज असलेल्या करारात, टाटा मोटर्सने इटलीच्या इव्हेको ग्रुपला €३.८ अब्ज मध्ये पूर्णपणे रोख व्यवहारात विकत घेण्याची योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे विस्तृत पोहोच, पूरक क्षमता आणि एकीकृत धोरणात्मक दृष्टीकोन असलेला एक शक्तिशाली जागतिक खेळाडू निर्माण होईल. ३० जुलै रोजी टाटा मोटर्स आणि इव्हेको ग्रुप …

Read More »

-मुख्यमंत्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणातून राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रास नवी दिशा

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने ‘खान अकॅडमी’ आणि ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी …

Read More »

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पोलिसांवर गुन्हे दाखल करा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला

परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती विधिमंडळात देत अपराधी पोलिसांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर निकाल देताना सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर गुन्हे …

Read More »

व्यापारी चर्चा डब्यात, अमेरिकेकडून भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि दंड, एक ऑगस्टपासून रशियाकडून शस्त्रास्त्र आणि कच्चे तेल खरेदी केल्याने २५ टक्के टेरिफबरोबर दंडही आकारला

मागील अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या भारत-अमेरिका दरम्यानच्या व्यापार चर्चेवर सुरु असलेल्या अटकळींना पूर्णविराम देत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (३० जुलै २०२५) घोषणा केली की भारताकडून रशियाकडून कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करणे, त्याचे उच्च शुल्क आणि व्यापारातील “कठोर आणि घृणास्पद” गैर-आर्थिक अडथळे यांचा उल्लेख करून १ ऑगस्टपासून …

Read More »

आरोग्य क्षेत्रातील पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अ‍ॅन्ड मिनिमल अ‍ॅक्सेस सर्जरी ट्रेनिंग (आयएमएमएएसटी) या दोन जागतिक …

Read More »

मंडप खड्ड्यासाठी आकारण्यात येणारा १५ हजारांचा दंड कमी करून घेऊ मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा देण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका

मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप, मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची टाळाटाळ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिराजी गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई मग मोदींवर कारवाई का नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई …

Read More »

मंगल प्रभात लोढा यांची माहिती, ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीत वाढ

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आय.टी.आय मध्ये क्रांती घडणार आहे, …

Read More »