Editor

आशिष शेलार यांचा आरोप, उबाठाकडून मुंबईकरांशी १ लाख कोटींची बेईमानी मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी

गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करत ही १ लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप …

Read More »

हवामान खात्याचा इशारा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊसाची हजेरी राहणार पुढील ६ ते ७ दिवस अती मुसळधार पाऊस

हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तर २७-३० मे दरम्यान केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, २९ मे पासून वायव्य भारतावर एक नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत …

Read More »

आयटीआर अर्थात आयकर परतावा दाखल करण्याच्या मुदतीत सीबीडीटीने केली वाढ ३१ जुलै ते १५ सप्टेंबर पर्यंत केली मुदत वाढीस मान्यता

भारताच्या प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) २०२५-२६ या कर निर्धारण वर्षासाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ज्या करदात्यांना पूर्वी ३१ जुलै २०२५ पर्यंत त्यांचे विवरणपत्र दाखल करायचे होते, त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वेळ मिळेल. या वर्षी आयटीआर फॉर्ममध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणा, फाइलिंग …

Read More »

भारतात एफडीआय गतवर्षाच्या तुलनेत १४ टक्के जास्त ८१.०४ टक्के जास्तीची एफडीआय भारतात आली

२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताला ८१.०४ अब्ज अमेरिकन डॉलर्स (तात्पुरत्या) किमतीची परकीय थेट गुंतवणूक अर्थात एफडीआय FDI मिळाली, जी मागील वर्षीच्या ७१.२८ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा १४% जास्त आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. मंत्रालयाने ही वाढ “गुंतवणूकदार-अनुकूल” एफडीआय धोरणामुळे झाली आहे ज्याचा स्पर्धात्मकता आणि आकर्षकता सुनिश्चित करण्यासाठी पुनरावलोकन …

Read More »

एलआयसीच्या नफ्यात वाढ, डिव्हीडंड केला जाहिर नफ्यात ३८ टक्क्यांची वाढ प्रति शेअर १२ रूपयांचा लाभांश जाहिर

एलआयसी अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळाने मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत त्यांच्या निव्वळ नफ्यात ३८% वाढ जाहीर केली आहे, जी ₹१९,०१३ कोटींवर पोहोचली आहे. ही वाढ मागील वर्षाच्या याच तिमाहीत ₹१३,७६३ कोटी नफ्याच्या तुलनेत आहे. तरीही, या तिमाहीत विमा कंपनीचे एकूण उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ₹२,५०,९२३ कोटींवरून …

Read More »

एनएसईच्या अनलिस्टेड शेअर्सचे भाव २२०० रूपयांवर स्टॉक एक्सचेंजचे बाजार मूल्य वाढले ५.३० लाख कोटींवर पोहोचले बाजार मुल्य

एनएसईचे अर्थात  नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अनलिस्टेड शेअर्स मंगळवारी ४७ टक्क्यांनी वाढून २,२०० रुपयांवर पोहोचले, जे केवळ चार दिवसांत १,५०० रुपयांच्या पातळीवरून आले होते, ज्यामुळे स्टॉक एक्सचेंजचे बाजारमूल्य ५.३० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक अपेक्षित असलेला इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) शेअर बाजार नियामकांकडून मंजुरी मिळण्याच्या जवळ येत …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठकीत झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदान, जालना इचलकरंजी महापालिकेला जीएसटी भरपाई मिळणार, महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी, “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार, …

Read More »

आता शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीस मान्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे सुधारित धोरण

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अंशकालिन निदेशकांची नियुक्ती, मानधन, शैक्षणिक पात्रता आणि कायम संवर्ग निर्मिती याबाबत आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली …

Read More »

शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप …

Read More »

विधि व न्याय विभागात टंकलेखकांच्या ५ हजार २२३ नवीन पदांची निर्मिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी

राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार ५ हजार २२३ टंकलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) या संवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन २ हजार ८६३ नियमित पदे निर्माण करण्यात …

Read More »