Editor

टॅरिफ विरामानंतर भारत अमेरिके दरम्यान व्यापारात वाढ व्यापाराने पहिलयांदाच १० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला

मार्च २०२५ मध्ये भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ११.२ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली, पहिल्यांदाच १० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आणि १२ महिन्यांच्या सरासरीपेक्षा जवळपास ५०% वाढ दर्शविली. युनायटेड स्टेट्स जनगणना ब्युरोने दिलेल्या वृत्तानुसार, निर्यातीतील या वाढीमुळे महिन्याभरात एकूण १५ अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय वस्तू व्यापार झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी …

Read More »

भारत यूके मुक्त करारांतर्गत ऑटोमोबाईल क्षेत्राला प्राधान्य कामगार केंद्रीय उद्योगांना प्राधान्य देण्याचा निर्णय

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे देशांतर्गत ऑटोमोबाईल उद्योगाला, विशेषतः प्रीमियमायझेशनच्या बाबतीत, लक्षणीय चालना मिळेल. अमेरिकेने २५% कर लादल्यामुळे देशांतर्गत ऑटोमोबाईल उद्योग अनिश्चिततेचा सामना करत असताना हे घडले आहे. कराराचा मजकूर अद्याप गुलदस्त्यात असताना, भारत सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की या करारामुळे कामगार-केंद्रित उद्योगांसाठी आणि अभियांत्रिकी वस्तू, ऑटो पार्ट्स आणि इंजिन …

Read More »

घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर दिलीप भोसले समितीकडून अहवाल सादर

घाटकोपर परिसरात होर्डिंग्ज पडण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीने बुधवार, ७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला अहवाल सादर केला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, पुढील कारवाईसाठी हा अहवाल आता सीलबंद लिफाफ्यात गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. अहवालातील मजकुरात घटनेच्या तपासातील निष्कर्ष तसेच भविष्यात …

Read More »

८० दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईद हजर ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले तर ८० दहशतवादी ठारर

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमापार अचूक हल्ले केले, ज्यामध्ये नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले गेले. या हल्ल्यांमध्ये ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तान आणि पीओकेमधील व्हिडिओंमध्ये भारताच्या दहशतवादी छावण्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर अंत्यसंस्कार होत असल्याचे दिसून आले. लाहोरजवळील मुरीदके येथील दहशतवादाशी संबंधित ठिकाणी भारतीय लष्कराच्या हल्ल्यात ठार झालेल्या तीन …

Read More »

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी रोख रक्कमच, राजीनाम्याचा पर्याय अंतर्गत चौकशीचा अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अंतर्गत चौकशी समितीने १४ मार्च रोजी रात्री भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना सादर केलेल्या अहवालानुसार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आगीदरम्यान रोख रक्कम आढळल्याची पुष्टी केली आहे. या घटनेची माहिती असलेल्या सूत्रांनी दिली की भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) यांच्या निर्देशानुसार हा अहवाल न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविणार २६० दिवस विना अपघात सेवा बजाविणाऱ्यास सन्मानित करणार

दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती  परिवार मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,कामगार आयुक्त तथा एसटी …

Read More »

विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर राष्ट्रीय एकतेसाठी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले. भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘ ऑपरेशन …

Read More »

अजित पवार म्हणाले, भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी

भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश …

Read More »

शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे केले अभिनंदन भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखली

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, …

Read More »

राज ठाकरे यांची ऑपरेशन सिंदूर बाबत खोचक प्रतिक्रिया, दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नाही मॉक ड्रिल नाही तर दहशतवाद्यांचे कोंबिग ऑपरेशन करण्याची गरज

देशातील प्रश्न संपत नसताना आपण युद्धाला सामोरे जात आहोत, ही गोष्ट योग्य वाटत नाही. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही नसल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी अजूनही सापडलेले …

Read More »