पश्चिम बंगालमध्ये, बंगाली घरांमध्ये मुख्य अन्न असलेला त्यांचा लाडका मासा स्वयंपाकघरातून थेट निवडणूक प्रचारात पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एका सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या लोकांना पुरेसे मासे खाऊ घालण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केल्यानंतर, हा साधा मासा अनपेक्षितपणे वादाचा मुद्दा बनला. पंतप्रधान मोदी यांनी पुढे …
Read More »हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या इराणच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांचे निधऩ तीन नेत्यांच्या काळात इराणच्या परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेले कमल खराझी याचे निधन
इराणचे माजी परराष्ट्र मंत्री, ज्यांनी एकेकाळी तेहरान अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न करू शकते असे सुचवले होते, त्यांचे गेल्या आठवड्यात झालेल्या हवाई हल्ल्यात जखमी झाल्यानंतर गुरुवारी (९ एप्रिल, २०२६) रात्री निधन झाले, असे इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने वृत्त दिले आहे. कमल खराझी यांनी इराणचे सुधारणावादी अध्यक्ष मोहम्मद खातमी यांचे परराष्ट्र मंत्री म्हणून, आणि …
Read More »अखेर न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात संसदीय चौकशी, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरु होती, मात्र अखेर राजीनामा
न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील शासकिय निवासस्थानाला आग लागल्यानंतर त्या आगीत काही नोटा जळून खाक झाल्याचे दिसून आले. तर काही अर्धवट स्थितीत जळाल्याचे आढळून आले. त्यावरून तत्कालीन सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या विरोधात महाभियोग खटला संसदेत दाखल करण्यात येणार होता. मात्र अखेर न्यायामुर्ती यशवंत …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६ आणि १७ एप्रिलला मुंबईत (diagnostic check) तपासणी होणार – नसीम खान
भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदेसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर …
Read More »आसाममध्ये ८५.०४ टक्के, तर केरळमध्ये ७७.३८ मतदान ४ मेला निकाल होणार जाहिर
गुरुवारी आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये दिवसभर मतदानाला वेग आला, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाच्या आकडेवारीनुसार जोरदार सहभाग दिसून आला. अधिकृत आकडेवारीनुसार, पुदुचेरीमध्ये सर्वाधिक ८९.०८ टक्के, त्याखालोखाल आसाममध्ये ८५.०४ टक्के, तर केरळमध्ये ७७.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील सर्व १२६ विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ८५.०४ टक्के मतदानाची नोंद …
Read More »अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांची युरोपियन मित्र राष्ट्रांना होर्मुजवरून दिला शेवटचा इशारा होर्मुजप्रकरणी धोरण निश्चितीबाबत विचारणा
अमेरिका आणि इराण यांच्यातील नाजूक युद्धविरामाने मुत्सद्देगिरीसाठी एक छोटी संधी निर्माण केली आहे. आता वॉशिंग्टन आपल्या युरोपीय मित्र राष्ट्रांवर जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीला सुरक्षित करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचा दबाव आणत आहे. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि किमतींवर दबाव आल्याने, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हे स्पष्ट …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का? नकार दिला संसदेच्या दोन्ही सभागृहात आमच्या पक्षाच्या वतीने अजित दादांच्या अपघाताच्या चौकशीसंदर्भात मुद्दा मांडला
दिवंगत अजित दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करायला रोहितला काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. त्यामुळे ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का? नकार दिला हा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सुप्रिया …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, डीपीटी लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रद्द करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रद्द तात्काळ रद्द करण्यात यावा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. जयंत पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, मुंबईच्या हाफकिन बायो फार्मास्यूटिकल कॉर्पोरेशनचे लसीकरणात फार …
Read More »जयकुमार रावल यांचे आश्वासन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा, सोबतच सामान्य ग्राहकांचे हितही जपले जावे, यासाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यास शासन कटीबद्ध असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री रावल यांनी कांदा प्रक्रिया व साठवणुकीच्या उपाययोजनांवर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न
म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली, “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट …
Read More »
Marathi e-Batmya