जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजिक परधाडे येथील रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली, तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन
मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पद, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या …
Read More »ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवा
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या जबर मारहाणीत झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका दैनिकातील बातमीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तसेच दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी …
Read More »छ. संभाजीनगरमधील ‘उबाठा’ च्या ५० पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत
छत्रपती संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या ५० प्रमुख पदाधिका-यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा. डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, नवनाथ पडळकर, संभाजीनगर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय …
Read More »फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरा पणन मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश
राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. आशियाई विकास बँक अर्थसहायित महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (magnet) प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह …
Read More »जळगांव परधाडे येथे रेल्वे दुर्घटनाः घाबरून एका रेल्वेतून उतरले अन् दुसऱ्या चिरडले अर्धा तास झाला तरी मध्य रेल्वेकडून अद्याप अधिकृत माहिती नाही
मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक रेल्वे एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे जळगांव रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही वेळातच परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ रेल्वे थांबवित रेल्वेतून खाली उतरले अन् त्याच रेल्वे ट्रॅकच्या समांतर असलेल्या दुसऱ्या ट्रॅकवर पोहोचले. मात्र त्यावेळी त्याच दुसऱ्या ट्रॅकवरून बंगरूळकडे निघालेल्या भरधाव वेगातील बंगळूरु एक्सप्रेस तेथून जात होती. त्यावेळी या पुष्पक एक्सप्रेसच्या …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटी बसस्थानकांवर ” हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे… राबविणार.. ३ कोटी रुपयांची बक्षिसे, राज्यात प्रथम येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला …
Read More »संत्रावर्गीय फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस १६५ कोटी ८३ लाखाची मदत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ऑगस्ट २०२४ मध्ये ढगाळ वातावरण आणि जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यास विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजाराची मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन …
Read More »रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी …
Read More »वाल्मिक कराडला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीः जामीनाचा मार्ग ? सीआयडीकडून चौकशी पूर्ण झाल्याची न्यायालयात माहिती
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका कायद्याखाली आणि अवादा कंपनीला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला सुनावण्यात आलेली ७ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा व्हिडिओ काँन्फरंसिंग्या माध्यमातून आज बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या …
Read More »
Marathi e-Batmya