दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने दुध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदाः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, बहिणींच्या संरक्षणासाठी समान नागरी कायदा लागू असता तर श्रद्धा वालकरची हत्या झाली नसती
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करताना, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी सांगितले की, देशात लागू होणाऱ्या या प्रकारच्या कायद्याचे उद्दिष्ट म्हणजे २०२२ मध्ये दिल्लीत एका महिलेच्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या हत्येसारखे गुन्हे पुन्हा घडू नयेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी अर्थात समान नागरी कायदातंर्गत लिव्ह-इन रिलेशनशिपची अनिवार्य …
Read More »वक्फ विधेयकावरील विरोधकांच्या सूचना फेटाळत सत्ताधाऱ्यांच्या सूचना मान्य समितीतील एनडीएच्या सूचना सांसदीय समितीने स्विकारल्या
वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ चे परीक्षण करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सोमवारी सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सदस्यांनी सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या स्वीकारल्या आणि कलम-दर-कलम चर्चेत विरोधी सदस्यांनी सुचवलेले प्रत्येक बदल फेटाळून लावले. मंजूर झालेल्या दुरुस्त्यांपैकी एक म्हणजे पॅनेलमधील गैर-मुस्लिम सदस्यांची संख्या वाढवणे. आता, पॅनेल सदस्यांपैकी दोन गैर-मुस्लिम असू शकतात. प्रस्तावित केलेल्या …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, नदीत स्नान केल्याने गरिबी दूर होते का? अन्न मिळते का ? अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी गंगा नदीत केले स्थान
नदीत डुबकी मारल्याने देशातील गरिबी कमी होणार आहे का, गरिबांच्या पोटाला अन्न मिळणार आहे का असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाला यावेळी केला. मध्य प्रदेशातील महू या गावी जय संविधान-जय बापू-जय भिम या काँग्रेसच्या अभियानात मल्लिकार्जून खर्गे बोलत होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, इथे बेरोजगारांना …
Read More »भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव” सहा हजार महाविद्यालयांमध्ये राबविणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या …
Read More »महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास प्रशासकिय मान्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रशासकीय मान्यता
पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे. पुणे शहरातील महात्मा फुले वाडा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, …
Read More »अर्थसंकल्पातील तूट कमी करण्यासाठी पुन्हा नवीन मध्यम मुदत कर्ज रोडमॅप कोविड काळातील कर्जाच्या परिभाषेच्या प्रमाणे नवी योजना
सध्याच्या राजकोषीय एकत्रीकरण मार्गाच्या अनुषंगाने, २०२५-२६ मध्ये आपली राजकोषीय तूट सकल उत्पादनाच्या (जीडीपी) ४.५% पेक्षा कमी ठेवण्याच्या मार्गावर असलेले केंद्र सरकार येत्या अर्थसंकल्पात सार्वजनिक कर्जाचे परिभाषित मार्गक्रमण करण्यासाठी एक नवीन मध्यम-मुदतीचा रोडमॅप सादर करू शकते. सूत्रांच्या मते, नवीन कर्ज-संबंधित रोडमॅपनुसार पुढील काही वर्षांसाठी राजकोषीय तूट ४.५% तपेक्षा कमी राहण्याची आवश्यकता …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता फक्त एनपीएस पेन्शन योजना युपीएस निवडण्याची संधी मिळेल
२०२५ च्या अर्थसंकल्पासाठी जेमतेम एक आठवडा शिल्लक असताना, अर्थ मंत्रालयाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये नोंदणीकृत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पर्याय म्हणून अधिकृतपणे एकीकृत पेन्शन योजना (UPS) सादर केली आहे. सरकारने असे स्पष्ट केले आहे की एकीकृत पेन्शन योजना युपीएस (UPS) आता सध्या एनपीएस NPS मध्ये सहभागी असलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी …
Read More »पंतप्रधान मोदींच्या सल्लागार डॉ शमिका रवी म्हणाल्या, वंधत्व, धर्मातंर आणि स्थलांतर अभ्यास अहवालावर व्यक्त केले मत
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या डॉ. शमिका रवी यांनी म्हटले आहे की मुस्लिमांमधील प्रजनन दरात घट झाली आहे याचा अर्थ असा नाही की देशात लोकसंख्याशास्त्रीय बदल होत नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत वाढीमध्ये फरक आहे, तोपर्यंत पातळी काहीही असो, एकाचा वाटा वाढेल आणि दुसऱ्याचा वाटा कमी होईल. “वेगवेगळ्या धर्मांचे …
Read More »
Marathi e-Batmya