Editor

नितेश राणे यांची मागणी, परिक्षेच्या कालावधीत बुरखा बंदी घाला भाजपाचे मंत्री नितेश राणे यांची शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी

राज्यात पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थिनींना बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली. पुढे आपल्या पत्रात मंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थिनींनी परिधान केलेल्या बुरख्यावर आक्षेप घेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी …

Read More »

मेगा पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती पर्यटन धोरण २०२४ मध्ये अटी आणि शर्ती देखील शिथिल केल्या

महाराष्ट्र पर्यटन धोरण २०२४ अंतर्गत, राज्यातील मेगा आणि अल्ट्रा मेगा पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी, अतिरिक्त सवलती आणि प्रोत्साहने देण्यासाठी आणि पर्यटन धोरण २०२४ मध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्ती शिथिल करण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन केली. आहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन विभागाचे …

Read More »

दिल्ली दौऱ्यावरील धनंजय मुंडे भेटले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनाः अन्नधान्य पुरवठ्यात वाढ करा सर्व्हरच्या समस्या, E Pos मशीन यांसह विविध अडचणींच्या अनुषंगाने जोशी - मुंडेंमध्ये सकारात्मक चर्चा

महाराष्ट्र राज्याला लाभार्थ्यांचे सुधारित वाटप NFSA अधिनियम – २०१३ अंतर्गत तत्कालीन लोकसंख्येच्या आधारावर ७ कोटी १६ हजार इतके लक्ष्य दिलेले होते. मात्र मागील दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून ८ कोटी, २० लाख, ६१ हजार इतके करण्यात यावे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारला २०२१ साली प्रस्ताव …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, ‘म्हाडा’च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे म्हाडा पुणे मंडळातर्फे ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात

सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, निती आयोगानेच सांगितलंय आर्थिक आणि सामाजिक स्थितीत घसरण निती आयोगाच्या अहवालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दिवाळखोरी होऊ नये, यासाठी अटलजींच्या सरकारने फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट आणला होता. महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये घसरण झाल्याचे निती आयोगाने सांगितलंय, हे अतिशय गंभीर आहे. निती आयोगाने दिलेल्या अहवालाची जबाबदारी राज्य सरकारच्या तिन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. सरकारने हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यावा, श्वेतपत्रिका काढून यावर …

Read More »

जयकुमार गोरे यांच्या सूचना, जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने कोकण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या. मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास व पंचायत …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आरोप, व्हिआयपी कल्चरमुळे घटना कुंभमेळ्यात अर्धवट व्यवस्था आणि व्हिआयपी कल्चर

महाकुंभात अर्धवट व्यवस्था, व्हीआयपी कल्चर आणि व्हीआयपींनी स्वतःहून केलेले प्रचार यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांचे जीव गेले, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सभास्थळी व्हीआयपी कल्चरवर बंदी घालण्याची मागणीही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मल्लिकार्जून खर्गे यांनी त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवर म्हणाले की, “महाकुंभमेळ्यादरम्यान तीर्थराज …

Read More »

मौनी अमावस्येच्या अंधारात नागरिकांचा आक्रोशयुक्त मृत्यू चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तीर्थक्षेत्राबद्दलच्या आशा भंग

महाकुंभमेळ्याच्या विस्तीर्ण परिसरात रात्र पडेपर्यंत, पवित्र नदीकाठ दुःखाचे आणि गोंधळाचे दृश्य बनले होते, ‘मौनी अमावस्ये’ रोजी ‘अमृत स्नान’ साठी जमलेल्या भाविकांनी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोलिस अधिकारी मानवी साखळ्या बनवत, सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी लाऊडस्पीकरवरून सूचना देत असताना, घाटांवर फाटलेले चप्पल, टाकून दिलेले कपडे आणि वैयक्तिक सामान विखुरलेले होते. बुधवारी …

Read More »

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या प्रती श्रद्धांजलीः मुख्यमंत्री योगी म्हणाले परिस्थिती नियंत्रणात स्थगित केलेले शाही स्नान दुपारी २.३० वाजता सुरु

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. जखमींच्या लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यात गुंतले आहे. काही काळापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि काही …

Read More »

महाकुंभ मेळ्यात पहाटेच्यावेळी चेंगराचेंगरीची घटना, १५ जण मृत्यूः संख्या वाढण्याची शक्यता मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास शाही स्थानासाठी उडालेल्या झुंबडमुळे चेंगराचेंगरी

बुधवारी (२९ जानेवारी २०२५) पहाटे महाकुंभाच्या संगम परिसरात मौनी अमावस्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी यात्रेकरू जागेसाठी धावपळ करत असताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने …

Read More »