Editor

भाडे आकरणीतील तफावतीवरून ओला आणि उबरला नोटीस केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस पाठविली

राईड-हेलिंग फर्म ओला कंझ्युमरने शुक्रवारी सांगितले की ती वापरकर्त्याच्या मोबाइल डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारे किंमत समायोजित करत नाही. तिचा जागतिक प्रतिस्पर्धी उबरने गुरुवारी अँड्रॉइड आणि अ‍ॅपल फोनसाठी वेगवेगळ्या किंमतींचे असेच आरोप फेटाळले होते. अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर समान राईड्स बुक केल्याने वेगवेगळे भाडे मिळत असल्याचा ग्राहकाचा दावा उत्तर म्हणून ओला …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, राज्य सरकार पैसे नाहीत असे कसे म्हणू शकते वसई विरार महापालिकेला निधी न देण्यावरून केला सवाल

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२४ जानेवारी) वसई-विरार महानगरपालिकेतील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी निधी न दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला आणि निधी कधी दिला जाईल हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने राज्याला २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन नियमांचे किती महानगरपालिकांनी पालन केले आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले. गेल्या आठवड्यात, प्रकल्पांसाठी निधी …

Read More »

उत्तर प्रदेशातील मायवतींच्या पुतळा उभारणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्व निर्णय निवडणूक आयोगाचे नियम सर्वांनी पाळा

२००७ ते २०१२ दरम्यान उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, त्यांचे गुरु कांशीराम आणि बहुजन समाज पक्षाचे (बसपा) चिन्ह असलेले हत्ती यांचे पुतळे लखनौ आणि नोएडा येथील उद्यानांमध्ये करदात्यांच्या पैशाने बांधल्याबद्दल २००९ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारी रोजी निकाल दिला. न्या. बी. व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा एसटीची भाडेवाढ मध्यरात्रीपासून तर… फेब्रूवारी पासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढणार

हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, दावोस दौऱ्यातल्या कंपन्या भारतातल्या तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही ? मंत्री रुसून गावी! आणि त्याच गॅंगमधले दुसरे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दावोसला

आपल्या राज्यात आणि देशात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग त्यांच्या कार्यालयाकडून योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसते अशी टीका शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्या दरम्यान २९ कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत. …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदतीची प्रक्रिया होणार पूर्णतः पेपरलेस

महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता राज्य शासनाद्वारे कार्यान्वित मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सुलभ व पेपरलेस होत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार …

Read More »

शरद पवार यांची टीका, दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा महाराष्ट्रातील कंपन्यांनाच तिथे बोलावून उद्योग आणत असल्याचा देखावा

दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात …

Read More »

येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार महावितरण चे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पांच वर्षांत १०० युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रु. ८७ प्रति युनिट …

Read More »

शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये ईडब्लूएस EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याची …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार,राष्ट्रीय मतदार दिनी आंदोलन लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपा व निवडणूक आयोगाचा निषेध करणार

भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार …

Read More »