Editor

सीबीडीटीचे नवे परिपत्रक, गुंतवणूक मागे घेतल्यास कर विभाग चौकशी करणार कर गळती रोखण्यासाठी भूमिका स्पष्ट

भारत मॉरिशस, सिंगापूर आणि सायप्रस यासारख्या काही कर करार असलेल्या देशांमधील मागील गुंतवणूक मागे घेईल आणि आयकर विभाग या चौकशीसाठी पुन्हा उघडणार नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका नवीन परिपत्रकात ही भूमिका स्पष्ट केली आहे जिथे त्यांनी कराराचा गैरवापर रोखून महसूल गळती रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रिन्सिपल पर्पज टेस्ट (पीपीटी) च्या …

Read More »

टाटा मोटर्स वाहन क्षेत्रात बाजारातील स्थान पुन्हा मिळवणार व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्स यांचे मत

टाटा मोटर्सचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्स म्हणाले की, कंपनी यावर्षी धोरणात्मक लक्ष केंद्रित करून आणि रिफ्रेश करून छोट्या कार किंवा हॅचबॅक विभागात बाजारपेठेतील वाटा पुन्हा मिळवण्याची योजना आखत आहे. “या वर्षी हॅचबॅकमध्ये आव्हाने आहेत. मला वाटते की ईव्ही आणि एसयूव्हीच्या नवीन मॉडेल्सच्या वेगाने सादरीकरणामुळे, आम्ही हॅचबॅकसाठी पुरेसा वेळ देऊ …

Read More »

दावोसमध्ये १५.७० लाख कोटी गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मितीचे ५४ सामंजस्य करार रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार

जानेवारी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित …

Read More »

एमएमआरडीए मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील वांद्रे कुर्ला संकुल येथील कन्व्हेशन सेंटर येथे ‘एमएमआरडीए’ च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मदत जाहिर मृतांच्या कुटुंबिंयाना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार मदत व बचाव कार्याचे दावोस येथून समन्वय

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या परधाडे रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. …

Read More »

जळगाव परधाडे येथील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी; अजित पवारांना दुःख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी, प्रशासनाकडून वेगाने मदतकार्य

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजिक परधाडे येथील रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली, तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन

मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पद, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या …

Read More »

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या जबर मारहाणीत झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका दैनिकातील बातमीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तसेच दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी …

Read More »

छ. संभाजीनगरमधील ‘उबाठा’ च्या ५० पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

छत्रपती संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या ५० प्रमुख पदाधिका-यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा. डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, नवनाथ पडळकर, संभाजीनगर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय …

Read More »

फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरा पणन मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश

राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. आशियाई विकास बँक अर्थसहायित महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (magnet) प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह …

Read More »